अनेकांना वाटत होतं मी निवृत्त होईन. पण, त्यांना ते जमलं नाही आणि राज्यातील जनतेने ते घडू दिलं नाही, असा टोला शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजप (BJP) आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना लगावला आहे. बारामती येथे आयोजित कृषी प्रदर्शन उद्घाटन समारंभ कार्यक्रमावेळी ते बोलत होते. या वेळी बोलताना जगभरातील शेती बदलली आहे. शेती क्षेत्रामध्ये निर्माण होत असलेले जगभरातील तंत्रज्ञान भारतातील शेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या दारात आले पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. या कृषीप्रदर्शनाचा हाच उद्देश असल्याचेही शरद पवार म्हणाले.
बारामती येथे आयोजित कृषी प्रदर्शन(, Agricultural Demonstration Baramati) कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते झाले. या वेळी आयोजित कार्यक्रमता शरद पवार बोलत होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, अभिनेता आमिर खान आणि कृषी क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह असंख्य शेतकरी उपस्थित होते. (हेही वाचा, सातारा: शरद पवार यांचे उदयनराजे भोसले यांना प्रत्युत्तर, 'मी कधीच म्हटलो नाही मला जाणता राजा म्हणा')
देशातील कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधकांवर आज अनेक मर्यादा आल्या आहेत. खरं म्हणजे कृषी क्षेत्रातील संशोधनाबाबत न्यायलायने काही बोलावे का याबाबाबत मी बोलणार नाही. तो त्यांचा अधिकार आहे. परंतू, त्यांनी या विषयात फार न बोललेलंच बरं. चुकीच्या संशोधनांवर जरुर बंदी घालायला हवी. परंतू, कृषी सारख्या क्षेत्रात सखोल आणि विस्तारीत संशोधन नेहमीच झाले पाहिजे अशी आपेक्षाही शरद पवार यांनी या वेळी व्यक्त केली.
बारामती: अनेकांना वाटत होतं मी निवृत्त होईन, पण त्यांना ते जमलं नाही; शरद पवार यांचा विरोधकांना टोला
बारामती येथे आयोजित कृषी प्रदर्शन(, Agricultural Demonstration Baramati) कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते झाले. या वेळी आयोजित कार्यक्रमता शरद पवार बोलत होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, अभिनेता आमिर खान आणि कृषी क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह असंख्य शेतकरी उपस्थित होते.
अनेकांना वाटत होतं मी निवृत्त होईन. पण, त्यांना ते जमलं नाही आणि राज्यातील जनतेने ते घडू दिलं नाही, असा टोला शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजप (BJP) आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना लगावला आहे. बारामती येथे आयोजित कृषी प्रदर्शन उद्घाटन समारंभ कार्यक्रमावेळी ते बोलत होते. या वेळी बोलताना जगभरातील शेती बदलली आहे. शेती क्षेत्रामध्ये निर्माण होत असलेले जगभरातील तंत्रज्ञान भारतातील शेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या दारात आले पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. या कृषीप्रदर्शनाचा हाच उद्देश असल्याचेही शरद पवार म्हणाले.
बारामती येथे आयोजित कृषी प्रदर्शन(, Agricultural Demonstration Baramati) कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते झाले. या वेळी आयोजित कार्यक्रमता शरद पवार बोलत होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, अभिनेता आमिर खान आणि कृषी क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह असंख्य शेतकरी उपस्थित होते. (हेही वाचा, सातारा: शरद पवार यांचे उदयनराजे भोसले यांना प्रत्युत्तर, 'मी कधीच म्हटलो नाही मला जाणता राजा म्हणा')
देशातील कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधकांवर आज अनेक मर्यादा आल्या आहेत. खरं म्हणजे कृषी क्षेत्रातील संशोधनाबाबत न्यायलायने काही बोलावे का याबाबाबत मी बोलणार नाही. तो त्यांचा अधिकार आहे. परंतू, त्यांनी या विषयात फार न बोललेलंच बरं. चुकीच्या संशोधनांवर जरुर बंदी घालायला हवी. परंतू, कृषी सारख्या क्षेत्रात सखोल आणि विस्तारीत संशोधन नेहमीच झाले पाहिजे अशी आपेक्षाही शरद पवार यांनी या वेळी व्यक्त केली.