Nashik Water Crisis: नाशिकच्या बोरीचीवाडी गावात तीव्र पाणीटंचाई; पाण्यासाठी महिलांना उतरावं लागतयं विहिरीत (Watch Video)
गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असल्याने, ग्रामस्थांना, विशेषतः महिलांना पाणी आणण्यासाठी दररोज अनेक किलोमीटर चालावे लागते किंवा खोल विहिरीत उतरावे लागते.
Nashik Water Crisis: नाशिक (Nashik) जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील बोरीचीवाडी गावातील (Borichivari Village) पाण्याचे संकट (Water Crisis) दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असल्याने, ग्रामस्थांना, विशेषतः महिलांना पाणी आणण्यासाठी दररोज अनेक किलोमीटर चालावे लागते किंवा खोल विहिरीत उतरावे लागते.
स्थानिक रहिवाशांचे आवाहन -
पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या महिलांनी सांगितले की, त्यांना दिवसातील बराचसा वेळ फक्त पाणी आणण्यात घालवावा लागतो, ज्यामुळे घरातील कामांवर आणि मुलांच्या संगोपनावर थेट परिणाम होत आहे. या परिस्थितीमुळे केवळ शारीरिक थकवा येत नाही तर मानसिक ताणही वाढतो. (हेही वाचा - India’s Hottest City: नागपूर देशातील सर्वात उष्ण शहर; तापमान 44 अंशा पार)
नाशिकच्या बोरीचीवाडी गावात पाण्याचे संकट -
#WATCH | Maharashtra | Women face hardships in their quest to get water for daily use amid water crisis in Borichivari village of Taluka Peth in Nashik district pic.twitter.com/2TTSBTaVMd
— ANI (@ANI) April 20, 2025
नाशिक जिल्हा परिषदेचा प्रतिसाद
बोरीचीवाडी गावातील पाणीटंचाईबाबत नाशिक जिल्हा परिषदेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली की, उन्हाळी हंगामात गरजू गावांना टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवण्याची योजना आखण्यात आली आहे. 2023 मध्ये कमी पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यात सुमारे 400 टँकरची आवश्यकता होती, परंतु 2024 मध्ये सरासरीपेक्षा 110% जास्त पाऊस पडला आहे. यामुळे यावर्षी टँकरची मागणी कमी होण्याची शक्यता आहे.
संकटाचा सामना करण्यासाठी 8.8 कोटी रुपये मंजूर -
या संकटाचा सामना करण्यासाठी, नाशिक जिल्हा प्रशासनाने बोरीचीवाडी गावात उद्भवलेल्या पाणीटंचाईचे निराकरण करण्यासाठी 8.8 कोटी रुपये मंजूर केले आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
(The above story first appeared on LatestLY on Apr 20, 2025 05:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

