
Northeast Floods 2025: ईशान्य भारत मुसळधार पाऊस (Northeast India Rains) बरसत असल्याने महापूर (Flash Floods) आणि भूस्खलन (Landslides) आदी नैसर्गिक आपत्तींनी हादरुन गेला आहे. खास करुन आसाम (Assam Flash Floods), अरुणाचल प्रदेश (Arunachal Landslide), मेघालय, मणिपूर आणि मिझोरममध्ये मोठ्या प्रमाणात अचानक पूर आणि प्राणघातक भूस्खलन झाल्याने किमान 30 जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक पातळीवर जनजिवन विस्कळीत झाले असून, काही भागांचा संपर्क तुटला आहे. प्रशासन उच्च पातळीवर सतर्क झाले असून, मदत आण बचावकार्य सुरु आहे. परिस्थिती नियंत्रणात असली तरी, अद्यापही एकूण हानी आणि झालेले नुसरान याबाबत निश्चित तपशील पुढे आला नाही.
आसाम आणि अरुणाचल प्रदेश राज्यात सर्वाधिक नुकसान
आसाम आणि अरुणाचल प्रदेशला या विनाशाचा फटका बसला, संपूर्ण घरे आणि वाहने भूस्खलनात गेली आणि पुराच्या पाण्याने हजारो रहिवासी विस्थापित झाले. आसामच्या कामरूप महानगर जिल्ह्यात, गुवाहाटीच्या बोंडा भागात झालेल्या भूस्खलनात मृत्युमुखी पडलेल्या तीन महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. (हेही वाचा, Maharashtra Weather Forecast: मान्सून मंदावला, विदर्भात आयएमडीचा यलो अलर्ट; इतर प्रदेशात काय स्थिती? जाणून घ्या हवामान अंदाज)
आसाममध्ये महापूर
Assam: Karimganj faces severe disaster after three days of relentless rain caused widespread flooding. The rivers are flowing above danger levels. Public roads, including the National Highway, are submerged due to artificial flooding, leaving many areas across the district… pic.twitter.com/3LmDqdjMaR
— IANS (@ians_india) May 31, 2025
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ASDMA) द्वारा देण्यात आलेल्या माहितीनुसार, 12 जिल्ह्यांमधील 60,000 हून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. अनेक सखल भाग पाण्याखाली गेले आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर आणि आपत्कालीन बचाव कार्य करावे लागत आहे.
आसामला हाय अलर्ट
#AssamFlood situation in the last 24 hours
Stay Alert! Stay Informed!#storm #disasterpreparedness #disaster #disasterrecovery #DisasterResponse #safety #emergencypreparedness #emergencymanagement pic.twitter.com/a4mlyOBaaS
— Assam State Disaster Management Authority (@sdma_assam) May 31, 2025
गुवाहाटी मध्ये 67 वर्षांतील सर्वाधिक पाऊस
गुवाहाटीत एकाच दिवसात 111 मिमी पाऊस पडला, ज्यामुळे 67 वर्षांचा जुना विक्रम मोडला. भारतीय हवामान विभागाने (IMD) ईशान्येकडील विविध भागांसाठी लाल आणि नारिंगी अलर्ट जारी केले आहेत, मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे आणि रहिवाशांना घरातच राहण्याचा आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.
आयएमडीकडून सतर्कतेचा इशारा
Multi Hazard Warning (31.05.2025)
Heavy to Very Heavy Rainfall very likely at isolated places over Arunachal Pradesh, Assam & Meghalaya, Nagaland, Manipur, Mizoram and Tripura and Sub Himalayan West Bengal & Sikkim.
Heavy Rainfall very likely at isolated places over Bihar,… pic.twitter.com/WJW3LdZvqd
— India Meteorological Department (@Indiametdept) May 31, 2025
अरुणाचल प्रदेशातील राष्ट्रीय महामार्ग-13 वर दुर्घटना
अरुणाचल प्रदेशच्या पूर्व कामेंग जिल्ह्यात, शुक्रवारी रात्री (30 मे) रात्री राष्ट्रीय महामार्ग 13 वर मोठा भूस्खलन झाला. दोन कुटुंबांना घेऊन जाणारी एक ब्रेझा एसयूव्ही बाना आणि सेप्पा दरम्यान खोल दरीत वाहून गेली, ज्यामुळे सात जणांचा मृत्यू झाला. जवळून प्रवास करणारी एक सुमो गाडी आपत्तीतून थोडक्यात बचावली.
या घटनेची पुष्टी करताना, अरुणाचल प्रदेशचे गृहमंत्री मामा नाटुंग यांनी फेसबुक पोस्टमध्ये शोक व्यक्त केला आणि नागरिकांना पावसाळ्यात रात्री प्रवास टाळण्याचे आवाहन केले.
काय आहे सद्यास्थिती?
#NortheastIndia #HeavyRains #Flood #BreakingNews GUWAHATI/IMPHAL/SHILLONG/ITANAGAR/AIZAWL: At least 32 people died in landslides and floods in the last 24 hours as heavy rains, triggered by a depression over north Bangladesh and adjoining Meghalaya battered five northeastern… pic.twitter.com/WHlNHEEWlk
— SK (@itssanatani) June 1, 2025
झिरोमध्ये भूस्खलनामुळे अधिक जीवितहानी
दुसऱ्या एका दुःखद घटनेत, आसामच्या लखीमपूर जिल्ह्यातील दोन रेस्टॉरंट कामगार झिरोमधील पाइन ग्रोव्ह येथे भूस्खलनात जिवंत गाडले गेले. राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), इंडो-तिबेटी सीमा पोलिस (आयटीबीपी) आणि स्थानिक स्वयंसेवकांच्या संयुक्त बचाव मोहिमेनंतर त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आल्याची पुष्टी पोलिस उपअधीक्षक ओजिंग लेगो यांनी केली.
सरकारने सुरक्षा उपाययोजना वाढवल्या
ब्रह्मपुत्रासारख्या नद्या सतत फुगत असल्याने, अधिकारी महामार्गांवर आणि भूस्खलनाच्या शक्यता असलेल्या भागात प्रतिबंधात्मक प्रयत्न वाढवत आहेत. बचाव पथके उच्च सतर्कतेवर आहेत आणि विस्थापित रहिवाशांना सामावून घेण्यासाठी निर्वासन आश्रयस्थाने उभारली जात आहेत.
दरम्यान, हवामान अंदाजानुसार येत्या काही दिवसांत आणखी पाऊस पडण्याची शक्यता असल्याने परिस्थिती गंभीर आहे. अधिकाऱ्यांनी संवेदनशील भागातील लोकांना सावध राहण्याचे आणि अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.