WTC Final: भारताने ऑस्ट्रेलियाच्या वाढवल्या अडचणी, आता Team India अशी फायनलमध्ये पोहोचणार
Team India (Photo Credit - Twitter)

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपुरात खेळला गेला. या सामन्यात भारताने कांगारू संघाचा 132 धावांनी आणि एका डावाने पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final) अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. इथून भारतीय संघासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप रस्ता आणखी सोपा झाला आहे. येथून फक्त एक सामना जिंकून टीम इंडिया (Team India) अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करू शकते. येथून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जाण्यासाठी टीम इंडियाला काय करावे लागेल ते जाणून घेऊया.

विजयानेच करता येईल काम

टीम इंडियाला या मालिकेत फक्त एक सामना जिंकण्याची गरज आहे आणि ते फायनलसाठी आरामात पात्र ठरतील. मात्र त्याचवेळी त्यांना या मालिकेतील उर्वरित दोन सामने अनिर्णित ठेवावे लागणार आहेत. ही मालिका भारताच्या बाजूने 2-0 अशी संपली तर पुन्हा एकदा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना खेळवला जाईल. (हे देखील वाचा: R Ashwin New Record: टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज आर अश्विनने केला अनोखा विक्रम, असा करणारा तो ठरला दुसरा भारतीय गोलंदाज)

ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या बाहेर जावू शकते

नागपुरात खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यातील विजयानंतर टीम इंडिया डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये आणखी मजबूत झाली आहे. टीम इंडियाची इच्छा असेल तर ते इथून ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम शर्यतीतून बाहेर फेकून देऊ शकते. मात्र यासाठी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाचा सफाया करावा लागणार आहे. या मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला 4-0 ने पराभूत केले आणि श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेत श्रीलंकेने 2-0 ने विजय मिळवला, तर ऑस्ट्रेलियन संघ डब्ल्यूटीसी अंतिम फेरीच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर जाईल आणि भारत आणि श्रीलंका अंतिम फेरीतील सामना खेळवला जावू शकतो.

भारताने नागपूरमध्ये सहज जिंकला सामना

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी सामना एकतर्फी जिंकला. टीम इंडियाच्या या विजयात अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि कर्णधार रोहित शर्माचा मोठा वाटा होता. या सामन्यात भारतीय संघ कांगारू संघावर पूर्णपणे जड होता. रवींद्र जडेजाने या सामन्याच्या दोन्ही डावात सात विकेट घेतल्या आणि बॅटने 70 धावा केल्या. जडेजाला त्याच्या चमकदार कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याचवेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात शानदार शतक झळकावले.