लस घेण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्यांवर दंडाची कारवाई करण्याचा निर्णय औरंगाबाद आणि सोलापूर जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या ज्या नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक लस घेतलेली नाही, अशा नागरिकांनी उद्या 15 डिसेंबरपर्यंत लस न घेतल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिला आहे.

ज्या नागरिकांनी लसीची एकही मात्रा घेतलेली नाही, किंवा दुसऱ्या मात्रेची तारीख उलटून गेल्यावरही दुसरी मात्रा घेतलेली नाही, अशा नागरिकांना आता पाचशे रुपये दंड ठोठावला जाणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)