नुकत्याच झालेल्या पावसामुळे मुंबईच्या सात प्रमुख तलावांतील पाणीपातळी 28 टक्क्यांच्यावर पोहोचली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) जल अभियंता विभागाने याबाबत माहिती दिली. यंदा दक्षिण-पश्चिम मान्सून 25 मे 2025 रोजी लवकर आला असला तरी, तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस न पडल्याने पाण्याची पातळी अजूनही समाधानकारक नाही. या तलावांमध्ये एकूण 14,47,363 दशलक्ष लिटर पाण्याची साठवण क्षमता आहे, आणि सध्या 4,06,463 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध आहे. मुंबईला दररोज सुमारे 3,950 दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते, आणि सध्याच्या साठवणुकीने पाणीटंचाई टाळण्यासाठी पावसाळ्यात अधिक पावसाची आवश्यकता आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव- भात्सा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तानसा, मोडक सागर, विहार, आणि तुलसी, मुंबई, ठाणे, आणि नाशिक जिल्ह्यांत पसरलेले आहेत. गेल्या 24 तासांत या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात एकूण 724 मिमी पावसाची नोंद झाली, ज्यामुळे पाणीपातळी 25.87% वरून 28.21% पर्यंत वाढली. गेल्या वर्षी याच काळात पाणीपातळी केवळ 5.32% होती, तर 2023 मध्ये ती 7.39% होती, यावरून यंदाची पातळी लक्षणीयरीत्या सुधारली असली तरी ती अजूनही पुरेशी नाही. (हेही वाचा: Maharashtra Weather Update: रायगड, रत्नागिरी आणि पुणे घाट परिसरात मुसळधार पाऊस पडणार; IMD कडून ऑरेंज अलर्ट जारी)

Mumbai Lakes Water Levels:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)