India-Pakistan Tension: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने 15 मे रोजी पहाटे 5:20 वाजेपर्यंत देशभरातील 24 विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्याच्या प्रयत्नानंतर दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, नागरी उड्डाण मंत्रालयाने 24 विमानतळे 10 मे पर्यंत नागरी उड्डाणांसाठी बंद राहतील, असं सांगितलं होतं. ( नक्की वाचा: BSF ने उधळला जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा दहशतवाद्यांचा प्रयत्न; सात दहशतवादी ठार (Watch Video).
भारतातील 24 विमानतळ 15 मे पर्यंत बंद -
The Ministry of Civil Aviation extends the closure of 28 airports across the country from May 10 to May 15 (5:29 am): Government Sources
— ANI (@ANI) May 9, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)