Tamil Nadu: तामिळनाडूच्या विरुधुनगर (Virudhanagar) जिल्ह्यातून शेकडो लोकांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. धार्मिक महोत्सवात मोफत जेवण जेवल्यानंतर ११८ जणांना अन्नातून विषबाधा झाली. ज्यात मुले आणि एका गर्भवती महिलेसह इतर महिला आणि पुरुषांचा समावेश आहे. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाधित व्यक्तींना अतिसार, उलट्या, पोटदुखी आणि चक्कर याचा त्रास जाणून लागला होता. त्यांना मदुराई येथील सरकारी राजाजी रुग्णालयात दाखल करण्यात (Tamil Nadu Food Poisoning)आले आहे. जेवणाचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. रुग्णालयात दाखल झालेल्यांमध्ये 34 पुरुष आणि 51 महिलांच समावेश आहे. सर्व रुग्ण सध्या वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत. त्यांच्यावर अन्नातून विषबाधा झाल्याच्या संशयावरून उपचार सुरू आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)