
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे वैद्यकीय निष्काळजीपणाची (Negligence Thane) हद्द घडल्याचे पुढे आले आहे. खासगी मालकिचे असलेल्या शिवनेरी रुग्णालयात (Shivneri Hospital Ulhasnagar) सेवा देणाऱ्या एका डॉक्टरांनी अभिमान तायडे (Abhiman Tayade) नामक 64 वर्षीय रुग्णास मृत घोषीत केले. त्याबाबत तसे मृत्यू प्रमाणपत्रही (Death Certificate Error) दिले. धक्कादायक म्हणजे डॉक्टरांच्या प्रमाणपत्र आणि घोषणेवर विश्वास ठेऊन नातेवाईकांनी त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी केली. मात्र, अंत्यसंस्कारांच्या काहीच वेळ आधी तो व्यक्ती जीवंत (Ulhasnagar Man Declared Dead Found Alive) असल्याचे आढळून आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. अतिशय धक्कादायक अशा या प्रकरणाची उल्हासनगर महापालिकेने (UMC) शिवनेरी रुग्णालयाला स्वतःहून (suo motu) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
काय घडले नेमके?
वैद्यकीय निष्काळजीपणा उघडकीस आलेल्या उल्हासनगर येथील रहिवासी मधुमेह, कावीळ आणि इतर गंभीर आरोग्य समस्यांनी ग्रस्त अभिमन तायडे यांना 12 जून या दिवशी त्यांच्या कुटुंबियांनी कॅम्प क्रमांक 4 येथील शिवनेरी खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या नाजूक प्रकृतीमुळे त्यांना रुग्णालयाच्या आत आणता आले नाही आणि वरिष्ठ सर्जन डॉ. प्रभू आहुजा यांनी ऑटोरिक्षात त्यांची तपासणी केली आणि त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर लगेचच मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्यात आले. डॉक्टरांनी मृत घोषीत करताच त्यांच्या कुटुंबीयांनी तायडे यांच्या अंत्यविधीची तयारी सुरु केली. मात्र, अंत्यविधीस काहीच वेळ बाकी असताना तायडे हे जीवंत असल्याचे धक्कादायकरित्या कुटुंबीयांच्या आणि उपस्थित नातेवाईकांच्या लक्षात आले. (हेही वाचा, Dead Body Breathes At Jhunjhunu: मृतदेहाने घेतला श्वास; मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यासह चार डॉक्टर निलंबीत; राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील घटना)
महापालिकेकडून कारणे दाखवा नोटीस
दरम्यान, ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ठाणे उल्हासनगर या घटनेची दखल घेतली. UMC आरोग्य अधिकारी मोहिनी धर्मा यांनी 'The Free Press Journal' ला सांगितले की, 'तायडे कुटुंबाने अधिकृत तक्रार दाखल केलेली नसली तरी आम्ही स्वतःहून कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. डॉक्टरच्या उत्तरावर आधारित पुढील चौकशी समिती गठीत केली जाईल का याचा निर्णय घेतला जाईल.'
डॉक्टरांकडून चूक मान्य
डॉ. आहुजा यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की त्यांनी रुग्णाला व्हेंटिलेटर सुविधा असलेल्या दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्यांनी मृत्यू प्रमाणपत्र का दिले, याचे ठोस स्पष्टीकरण ते देऊ शकले नाहीत. त्यांनी कबूल केले की रुग्णालयाजवळ सुरू असलेल्या रस्त्याच्या जोरदार कामामुळे ते नाडी ओळखू शकले नसावेत. 'ही चूक झाली याबद्दल मी माफी मागतो,' असे ते म्हणाले.
पोटाने दिले जीवदान
रुग्णाला मृत घोषित केल्यानंतर त्याचे कुटुंबीय घरी परतले आणि अंतिम संस्काराची तयारी सुरू केली. परंतु त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की पोट हलत आहे आणि श्वास चालू आहे. त्यानंतर तातडीने त्यांना क्रिटिकेअर हॉस्पिटल, उल्हासनगर येथे दाखल करण्यात आले, जिथे ते आयसीयूमध्ये भरती आहेत. क्रिटिकेअर हॉस्पिटलचे डॉ. प्रकाश कौरणी यांनी सांगितले, 'रुग्ण मधुमेह आणि पिवळ्या तापाने ग्रस्त आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. तपासणीदरम्यान त्यांच्या पोटात ट्युमरही आढळले आहे.'
डॉ. आहुजा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, 'रुग्ण सायंकाळी साडेआठ वाजता बेशुद्ध अवस्थेत आणण्यात आला होता. सुमारे 30 मिनिटांपासून तो प्रतिसाद देत नव्हता. तोंडातून फेस निघत होता आणि श्वास घेत नव्हता. मी कुटुंबीयांना दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. काही वेळाने ते परत आले आणि मृत्यू प्रमाणपत्र मागितले. मला त्यावेळी रुग्ण जिवंत असल्याचे माहिती नव्हते. कुटुंबीयांनी आम्हाला काहीही सांगितले नाही. मी फसवणूक झाल्याची भावना व्यक्त करतो.'