
Maharashtra Crime News: भिवंडी येथे दुकानात घुसून एका किराणा दुकानदाराची हत्या (Thane Murder Case) केले प्रकरणी ठाणे कोर्टाने दोघा पुरुषांना जन्मठेपेची शिक्षा (Thane Court Verdict) ठोठावली आहे. विशेष न्यायाधीश (MCOCA) अमित एम. शेटे यांनी 26 मे रोजी हा निकाल सुनावला आणि पीटीआयनुसार, आदेशाची प्रत गुरुवारी उपलब्ध झाली. हे हत्या प्रकरण 2017 मध्ये (2017 Grocer Murder) घडले होते. पोलीस तपासानंतर कोर्टाने दोन्ही बाजू ऐकूण घेतल्या आणि उपलब्ध साक्षी पुराव्यांनुसार कोर्टाने हा निकाल दिला.
दोषींवर अनेक आरोप आणि गुन्हे
दोन दोषी - रामाशिष उर्फ आशिष राजेंद्र पटेल (36) आणि सागर ज्ञानेश्वर कटले (34) - यांना भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 302 (खून), कलम 307 (खून करण्याचा प्रयत्न), कलम 460 (रात्री घरफोडी) आणि कलम 34 (सामान्य हेतू) यासह अनेक कलमांखाली दोषी ठरवण्यात आले. (हेही वाचा, Palghar Murder Case Reopened After 23 Years: जातोस कुठे? सुट्टी नाही! पालघर हत्या प्रकरात ऑटोरिक्षा चालक 21 वर्षांनी अटक)
आरोपींवर मकोका, पण सबळ पुराव्यांआभावी सुटका
सुरुवातीला, आरोपींच्या पूर्वीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत आरोप देखील समाविष्ट होते. दरम्यान, कोणत्याही संघटित गुन्हेगारी सिंडिकेटमध्ये त्यांचा सहभाग सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्यामुळे न्यायालयाने त्यांना मकोका आरोपातून मुक्त केले.
आरोपींकडून पती-पत्नीवर हल्ला
सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 26 जानेवारी 2017 रोजी रात्री घडली, जेव्हा आरोपी सुरेश गुप्ता यांच्या किराणा दुकानात घुसले. त्यावेळी गुप्ता आणि त्यांची पत्नी सुनीता गुप्ता दोघेही झोपले होते. समोरासमोर आल्यावर, घुसखोरांपैकी एकाने सुरेश गुप्ताच्या पोटात वार केला. आरडाओरडा करणाऱ्या सुनीता यांच्यावरही हल्ला करण्यात आला आणि पोटात वार करण्यात आले आणि त्यानंतर दोघे पळून गेले.
दरम्यान, भिवंडीतील आयजीएम रुग्णालयात पोहोचताच सुरेश गुप्ता यांना मृत घोषित करण्यात आले, तर त्यांच्या पत्नीला वैद्यकीय सेवा मिळाल्यानंतर त्यांचे प्राण वाचले. न्यायाधीश शेटे यांनी त्यांच्या निकालात म्हटले आहे की, आरोपी कोणत्याही संघटित गुन्हेगारी संघटनेचा भाग असल्याचे सिद्ध करणारे कोणतेही निर्णायक पुरावे नाहीत. सर्वात कमी म्हणजे, पुरावे असे सूचित करतात की आरोपी चोरी आणि दरोडा यासारख्या गुन्ह्यांमध्ये सहभागी होते, असे त्यांनी निरीक्षण नोंदवले.
न्यायालयाने असा निष्कर्ष काढला की, सरकारी वकिलांच्या पुराव्यांवरून खून, खुनाचा प्रयत्न आणि सामान्य हेतूने घरात घुसखोरी केल्याच्या आरोपांना पुष्टी मिळाली. दोन्ही आरोपींना ₹80,000 दंड ठोठावण्यात आला, तर ₹70,000 सुनीता गुप्ता किंवा मृताच्या वारसांना देण्याचे आदेश देण्यात आले.