
Maharashtra Road Projects: प्रवाशांसाठी मोठा दिलासा म्हणून, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील (Mumbai Pune Expressway) बहुप्रतिक्षित 'मिसिंग लिंक' प्रकल्प (Missing Link Project) डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असून, तो वेळेत पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे. या प्रकल्पामुळे भारतातील सर्वात व्यस्त महामार्गांपैकी एक असलेल्या महामार्गावरील प्रवासाचे अंतर लक्षणीयरीत्या कमी होईल आणि गर्दी कमी होईल, असा दावा सरकार आणि प्रशासनाकडून केला जात आहे.
ताशी 120 किमी वेगाने प्रवास
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) अधिकाऱ्यांच्या म्हटले आहे की, पायाभूत सुविधांच्या सुधारणांमुळे प्रवासाचे अंतर 13.3 किलोमीटरने कमी होईल आणि प्रवासाचा वेळ अंदाजे 20 ते 25 मिनिटांनी कमी होईल. एकदा कार्यान्वित झाल्यानंतर, नवीन मार्गावर वाहने ताशी 120 किमी वेगाने प्रवास करू शकतील. तीक्ष्ण वळणांचा कटाकक्षाने केलेला कमी वापर, डोंगराळ भागातून कमी-चढ उतारासाठी सपाट मार्ग उपलब्ध करुन दिल्याने प्रवासाचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. मएसआरडीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा हवाला देत मिड-डेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, बांधकाम वेगाने सुरू आहे, सर्वात गुंतागुंतीचा घटक - 45 मजली उंच केबल-स्टेड पूल - पूर्ण होण्याच्या जवळ आहे. (हेही वाचा, Mumbai-Nagpur Samruddhi Expressway: संपूर्ण मुंबई ते नागपूर समृद्धी द्रुतगती मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडले अखेरच्या टप्प्याचे लोकार्पण)
प्रकल्पाची थोडक्यात वैशिष्ट्ये
मिसींग लिंक प्रकल्पात 650 मीटर लांबीचा केबल-स्टेड पूल, 840 मीटर लांबीचा व्हायाडक्ट आणि दोन बोगदे आहेत - एक 1.75 किलोमीटर लांबीचा आणि दुसरा 8.9 किलोमीटर लांबीचा आहे, जो लोणावळा तलावाच्या खाली 170 फूट खोल आहे. हा अभियांत्रिकी चमत्कार लोणावळा-खंडाळा विभागाच्या आव्हानात्मक भूभागातून एक गुळगुळीत बायपास प्रदान करेल.
प्रकल्प केव्हा पूर्ण होणार?
सुरुवातीला सुमारे ₹६,६०० कोटी खर्चाचा अंदाज होता, या प्रकल्पाला अनेक विलंब झाला आहे. सुरुवातीला मार्च 2024 मध्ये पूर्ण होण्याची तारीख होती, परंतु ही अंतिम तारीख अनेक वेळा सुधारित करण्यात आली - जानेवारी 2025, मार्च 2025, जून 2025आणि ऑगस्ट 2025. आता, अद्ययावत माहितीनुसार अंतिम तारीख सप्टेंबर 2025निश्चित करण्यात आली आहे, जरी अधिकारी या वर्षी डिसेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणात पूर्ण होण्याबद्दल आशावादी आहेत.
Another achievement of Devendra ji:Pune-Mumbai journey will become even faster.The Mumbai-Pune Expressway will be expanded to 10 lanes. @Dev_Fadnavis pic.twitter.com/mdeWRnqiub
— Harsha Patel 🇮🇳 (@harshagujaratan) June 9, 2025
मार्च 2025 च्या सुरुवातीला, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा प्रकल्प ऑगस्ट 2025 पर्यंत कार्यान्वित होईल अशी पुष्टी केली होती. त्यांनी सांगितले होते की यामुळे वेळ वाचेल, इंधनाचा वापर कमी होईल आणि मुंबई-पुणे मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
दरम्यान, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा प्रवाशांसाठी आणि मालवाहतूक वाहतुकीसाठी एक महत्त्वाचा वाहतूक मार्ग आहे. एकदा पूर्ण झाल्यावर, मिसिंग लिंक प्रकल्प सुरक्षितता वाढवेल, प्रवासाचा वेळ कमी करेल आणि एकूण वाहतूक प्रवाह सुधारेल, ज्यामुळे मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवास जलद आणि अधिक कार्यक्षम होईल अशी अपेक्षा आहे.