Uttar Pradesh Rain: उत्तर प्रदेशात पावसामुळे गेल्या 24 तासांत 6 जणांचा मृत्यू; घरीच राहण्याचे दिले आदेश
Rain | representative pic- (photo credit -pixabay)

Uttar Pradesh Rain: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बहुतांश भागात मान्सूनच्या संततधार पावसाने कहर केला आहे. उत्तर प्रदेशातील अर्ध्याहून अधिक जिल्ह्यांना पूर्वी दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत असताना, आता पुराचा धोका असताना, वीज पडणे आणि घरे कोसळण्याच्या घटनांमुळे गेल्या २४ तासांत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक शहरांतील रहिवासी भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे आणि नद्यांना फुगणे सुरू झाल्याने ग्रामीण भागात पुराचा धोका निर्माण झाला आहे.

येत्या सात दिवसांत मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.  लखनौमध्ये सोमवारी 93.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली, ज्यामुळे अनेक गृहनिर्माण वसाहतींमध्ये पाणी साचले आणि रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. लोकांना घरीच राहण्याचे आदेश दिले जात आहे. काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील अनेक शाळांना सुट्टी जाहीर केली.

 

मुरादाबादमध्ये सोमवारी रेल्वे ट्रॅक खोळंबला असून नऊ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कानपूरमध्ये एकाचा, लखनऊमध्ये एका महिलेचा आणि बाराबंकीत दोन मुलांचा मृत्यू झाला. हे सर्व मृत्यू पावसात कोसळल्याने झाले आहेत. मिर्झापूर येथे वीज पडून सात विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यात अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत.बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाचे कारण सांगून हवामान खात्याने येत्या सात दिवसांत मुसळधार ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. सोमवारी संध्याकाळी लखनौ आणि लगतच्या भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे