Heatwave | (Photo credit: archived, edited, representative image)

मुंबई: मुंबई आणि संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात (MMR) सध्या उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत. मागील काही दिवसांपासून वाढलेला पारा आणि सोबतीला असलेल्या आर्द्रतेमुळे (Humidity) मुंबईकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. मात्र, हवामान अंदाजानुसार, आजचा दिवस मुंबईसाठी या मोसमातील उष्णतेच्या लाटेचा शेवटचा 'पीक' दिवस ठरण्याची शक्यता आहे.

​सद्यस्थिती काय आहे?

सध्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरात तीव्र उष्णतेची लाट जाणवत आहे. आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने प्रत्यक्ष तापमानापेक्षा 'फील लाईक' तापमान (जाणवणारी उष्णता) अधिक असून नागरिकांना प्रचंड घाम आणि अस्वस्थतेचा सामना करावा लागत आहे. दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत असून उष्माघातापासून वाचण्यासाठी नागरिक सावधगिरी बागत आहेत.

हवामानात बदल आणि दिलासा

यामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ३६ ते ३९ अंशांच्या आसपास असलेला पारा कमी होऊन मुंबईकरांना वाढत्या उकाड्यापासून मोठा दिलासा मिळू शकतो.