शोएब अख्तर ने केले खळबळजनक विधान, म्हणाला जर वसीम अकरमने मला मॅच फिक्सिंगसाठी बोलला असता तर मी त्याला मारलं असतं

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरमोठे विधान केले आहे. अख्तरने अगदी असे देखील म्हटले होते की त्यांनी वसीम यांचा जीव घेतला असता. अख्तरने क्रिकेट पाकिस्तानच्या टीव्ही शो दरम्यान म्हटले की, “मी हे स्पष्टपणे म्हणेन की कर्णधार वसीम अकरमने मला मॅच फिक्सिंग करण्यास सांगितले असते तर मी त्याचा नाश केला असता किंवा त्याला ठार मारले असते, परंतु त्यांनी मला असे कधीच म्हटले नाही."

शोएब अख्तर ने केले खळबळजनक विधान, म्हणाला जर वसीम अकरमने मला मॅच फिक्सिंगसाठी बोलला असता तर मी त्याला मारलं असतं
शोएब अख्तर आणि वासिम अकरम (Photo Credit: Getty)

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) त्याच्या खळबळजनक विधानांसाठी प्रसिद्ध आहे. कारकिर्दीत शोएबला अनुभवी वेगवान गोलंदाज वसीम अकरम (Wasim Akram) बरोबर खेळण्याची संधीही मिळाली. अख्तर त्याच्यावर खूप प्रभावित झाला आहे आणि म्हणाला कीवसीमने पाकिस्तानला सामना जिंकवून देताना पाहून त्याला आनंद व्हायचा. पण आता या महान गोलंदाजाबद्दल शोएबने मोठे विधान केले आहे. अख्तरने अगदी असे देखील म्हटले होते की त्यांनी वसीम यांचा जीव घेतला असता. त्याच्या यूट्यूब चॅनल किंवा कोणत्याही टीव्ही शो मध्ये तो नेहमी क्रिकेटच्या अधिकाराबद्दल बोलतो. अख्तरने क्रिकेट पाकिस्तानच्या टीव्ही शो दरम्यान म्हटले की, “मी 1990 च्या दशकातील काही सामने पाहत होतो आणि वसीम अकरमने आपल्या शानदार गोलंदाजीमुळे अशक्य परिस्थितीत पाकिस्तानला जिंकण्यास कशी मदत केली हे पाहून मी चकित झालो." (IND vs PAK क्रिकेट मालिकेवर BCCI ने सोडले मौन, भारत सरकारच्या अनुमतीशिवाय खेळण्यास दिला नकार)

अख्तर पुढे म्हणाला, "मी हे स्पष्टपणे म्हणेन की कर्णधार वसीम अकरमने मला मॅच फिक्सिंग करण्यास सांगितले असते तर मी त्याचा नाश केला असता किंवा त्याला ठार मारले असते, परंतु त्यांनी मला असे कधीच म्हटले नाही." रावळपिंडी एक्स्प्रेसने अकरमच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आणि म्हटले की क्रिकेटच्या सुरुवातीच्या कारकीर्दीत मी त्याला खूप मदत केली. अख्तरने वसीम अकरमचे कौतुक केले आणि म्हणाले, मी त्याच्याबरोबर जवळपास 7-8 वर्षे खेळलो. असे अनेक प्रसंग होते जेव्हा वसीमने सुरुवातीला विकेटची जबाबदारी स्वीकारली आणि मला खालच्या फळीतील फलंदाजांना बद्द करण्यासाठी सोडले."

दुसरीकडे, अख्तर अलीकडेच कोरोना व्हायरस पीडितांसाठी भारत-पाकिस्तान चॅरिटी मॅच आयोजित करण्याच्या प्रस्तावामुळे चर्चेचा विषय बनला होता. मात्र, भारतीय क्रिकेट दिग्गज खेळाडू कपिल देव आणि सुनील गावस्कर यांनी त्याचा प्रस्ताव नाकारला.

(The above story first appeared on LatestLY on Apr 21, 2020 04:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).