IND vs BAN 2nd Test Day 4: टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात बांगलादेशचा 3 गडी राखून केला पराभव, मालिका 2-0 ने केली क्लीन स्वीप
श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विन यांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
IND vs BAN 2nd Test: दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशचा तीन गडी राखून पराभव केला. त्यांनी सामन्याच्या चौथ्या दिवशी (रविवार) 7 गडी गमावून 145 धावांचे लक्ष्य गाठले. श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विन यांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. यासह भारताने बांगलादेशचा दोन सामन्यांच्या मालिकेत 2-0 असा व्हाईटवॉश केला. बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन आणि मेहदी हसन मिराज यांनी मिळून आणखी तीन विकेट घेतल्यावर टीम इंडिया हरेल असं वाटत होतं, पण श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विननं हे होऊ दिलं नाही. दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
2ND Test. India Won by 3 Wicket(s) https://t.co/CrrjGfXPgL #BANvIND
— BCCI (@BCCI) December 25, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 25, 2022 10:55 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

