IND vs PAK Women's World Cup: भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात महिला विश्वचषक (Women's World Cup) स्पर्धेचा पहिला सामना बे ओव्हल येथे खेळला जात आहे. स्मृती मंधानाच्या (Smriti Mandhana) अर्धशतकी खेळीनंतर एका क्षणी भारताची धावसंख्या 1 गडी गमावून 96 धावा होती, पण दीप्ती शर्मा बाद होताच टीम इंडियाचा (Team India) फलंदाजी क्रम  पत्त्यासारखा विखुरला. आणि भारताने 34 षटकांत 115 धावांत 6 विकेट गमावल्या आहेत. कर्णधार मिताली राज, उपकर्णधार हरमनप्रीत कौर, धडाकेबाज सलमी फलंदाज शेफाली वर्मा यांच्यासारख्या धुरंधर खेळाडूंनी पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीपुढे गुडघे टेकले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)