मुंबई: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी-20 सामना (IND vs ENG 5th T20I 2025) आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium, Mumbai) खेळवला जात आहे. चौथ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 15 धावांनी पराभव केला आहे. यासह, टीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका जिंकली आहे. सध्या टीम इंडियाने मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली आहे. तसेच जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघ विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाचा स्टार फलंदाज अभिषेक शर्माने 17 चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. भारताचा स्कोर 70/1
On The Charge ⚡️⚡️
Abhishek Sharma is on the move and brings up his fifty 👌
Live ▶️ https://t.co/B13UlBNLvn#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/RFfx4Gae4k
— BCCI (@BCCI) February 2, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)