महा विकास आघाडी (राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेना युती) ने 11 ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरी हिंसाचाराच्या घटनेविरोधात राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी याबाबत माहिती दिली. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे भाजप कार्यकर्ते आणि आंदोलन करणारे शेतकरी यांच्यामध्ये झटापट झाली होती. त्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या या घटनेमुळे देशातील वातावरण चांगलेच तापले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)