शिंदे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर येऊन जवळपास महिना उलटला तरी राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र आता यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार केला जाणार आहे. सरकार शेतकरी आणि सामान्य माणसांच्या हिताचे निर्णय घेत आहे. हे सरकार शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)