![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/07/100-3-380x214.jpg)
Thane: ठाण्यातील ओवळा येथील पानखंडा गावात अत्यंत धक्कादायक घटना घडली असून येथील धरणात (Owala Dam) बुडून 19 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाने बुधवारी या तरुणाचा शोध घेतला. पण हलका आणि मुसळधार पावसामुळे शोधमोहीम पूर्ण होऊ शकली नाही. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता पुन्हा शोधमोहीम सुरू झाली आणि दुपारी अडीच वाजता तरुणाचा मृतदेह सापडला.
ठाणे येथील आरडीएमसीचे प्रमुख यासीन तडवी यांनी सांगितले की, ठाण्यातील ओवळा येथील पानखंडा गावात एका 19 वर्षीय व्यक्तीच्या धरणात पडल्याची माहिती आम्हाला 26 जुलै रोजी रात्री 10 वाजता आपत्ती व्यवस्थापन कक्षात मिळाली. चिराग जोशी असं या तरुणाचं नाव आहे. तो कळव्यातील पारसिक नगर येथील ओम साई टॉवर येथे राहत होता. तो त्याच्या मित्रांसोबत धरणात पोहण्यासाठी गेला होता. त्याचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडला आणि बुडाला. यासंदर्भात माहिती मिळताच आपत्ती दलाने घटनास्थळी धाव घेतली. (हेही वाचा - Thane Rain Updates: ठाणे शहरात मुसळधार पाऊस, रस्त्यांवर साचले पाणी, वाहतुक कोंडी)
तडवी यांनी पुढे सांगितले की, पाण्यात बुडालेल्या व्यक्तीचा शोध सुरू झाला आणि जवळपास 3 तास या ठिकाणी गेले. परंतु, बुधवारी रात्रीच्या अंधारात शोध घेणे शक्य नसल्याने शोधकार्य थांबवण्यात आले. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता शोधमोहीम पुन्हा सुरू झाली आणि दुपारी अडीच वाजता चिरागचा मृतदेह सापडला. आम्ही मृतदेह कासारवडवली पोलिसांच्या ताब्यात दिला.
19-year-old boy #drowns in a #dam in Pankhanda village at Owala. Dead body recovered by Regional Disaster Management Cell in #Thane. pic.twitter.com/ahfUZOVKgV
— Free Press Journal (@fpjindia) July 27, 2023