रायगड जिल्ह्यात आज दिवसभरात 535 नवे रुग्ण आढळले असून 11 जण दगावल्याची माहिती मिळत आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 682 रुग्णांचा मृत्यू झाला आहे असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व विभागांतील नामवंत शिक्षण तज्ज्ञांचा आणि अभ्यासकांचा समावेश असलेली समिती नेमून या धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात व्यवस्थित विचारविनिमय करावा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

पश्चिम घाटातील जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण करण्यास राज्य शासन कटिबद्ध. तेथील जंगल, वनसंपदा तसेच पर्यावरणाला कुठल्याही वनेतर उपक्रमांमुळे हानी पोहोचू देणार नाही. अशा वनेतर उपक्रमांना परवानगी दिली जाणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली स्पष्ट भूमिका.

राजस्थान मध्ये आज दिवसभरात 1330 नवे रुग्ण आढळले असून 11 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यामुळे राजस्थान मध्ये कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 66,619 वर पोहोचली असून मृतांचा एकूण आकडा 921 पोहोचला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्वात मोठे तानसा तलाव आज संध्याकाळी 7.05 च्या सुमारास ओव्हरफ्लो झाले असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

मुंबईत मागील 24 तासांत 1275 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले असून 46 रुग्ण दगावल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. यामुळे मुंबईत कोरोना बाधितांची एकूण संख्या 1,32,817 वर पोहोचली असून मृतांचा आकडा 7,311 वर पोहोचला आहे.

धारावीत आज 17 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे धारावीतील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2697 वर पोहोचला आहे. सध्या 95 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

हरियाणामध्ये 996 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

महाराष्ट्रात आज 14,492 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून 326 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज 12,243 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे सध्या राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6,43,289 इतकी झाली आहे.

 

कर्नाटकमध्ये गेल्या 24 तासात 7,385 नवे कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

 

Load More

कोरोना व्हायरसवर ठोस औषध किंवा लस उपलब्ध नसल्याने कोरोना बाधितांच्या वाढत्या आकड्यामुळे निर्माण होणारी बिकट परिस्थिती नियंत्रणात ठेवणे हे मोठे आव्हान आहे. परंतु, ट्रेस, टेस्ट आणि ट्रिटच्या माध्यमातून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात प्रशासनाला बहुतांशी यश आले आहे. कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडा वाढत असल्याने रिकव्हरी रेटही सुधारत आहे. दरम्यान मागील 24 तासांत देशात कोविड-19 च्या तब्बल 9 लाख चाचण्या करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

मुंबईत मुसळधार पाऊस झाल्याने जलसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईतील 20% पाणीकपात 10% वर आली आहे. 31 जुलै 2021 पर्यंत पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी 21 ऑगस्टपासून मुंबईत 10% पाणी कपात करण्यात येणार आहे. ही पाणीकपात ठाणे, भिवंडी महानगरपालिका आणि इतर गावांना देखील लागू होणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून प्रशासनाला सहकार्य करावे असे मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात येत आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

दरम्यान सुशांत सिंह राजपूत प्रकरणामुळे महाराष्ट्र विरुद्ध बिहार या वादावर पडदा पडला आहे, असे म्हणायला हरकत नाही. कारण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. या निर्णयाचे सुशांतचे कुटुंबिय, चाहते आणि बॉलिवूड कलाकारांनी स्वागत केले आहे.