Prithvi Shaw (Photo Credit - Twitter)

 Prithvi Shaw: स्टार फलंदाज पृथ्वी शॉ हा भारतीय संघाचा (Team India) नवा सुपरस्टार मानला जात होता. पण सध्या तो भारतीय संघाभोवतीही दिसत नाही. तो स्थानिक संघात स्थान मिळविण्यासाठीही संघर्ष करत आहे. रणजी ट्रॉफी दरम्यान, त्याला मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले त्यानंतर विजय हजारे संघातही त्याचा समावेश करण्यात आला नाही. त्याच वेळी, काही महिन्यांसाठी अनुभवी खेळाडूंनी पृथ्वी शॉ( Prithvi Shaw)च्या कारकिर्दीबद्दल चिंता व्यक्त केली. बऱ्याच काळानंतर, पृथ्वी शॉने त्याच्या कारकिर्दीबद्दल मौन सोडले आहे आणि म्हटले आहे की त्याचे लक्ष विचलित झाले आहे.

पृथ्वी शॉने 2018 मध्ये कसोटी पदार्पण केले. त्याने त्याच्या पदार्पणाच्या डावात 134 धावा केल्या. त्या काळात रवी शास्त्री म्हणाले होते की पृथ्वी शॉ हा सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा आणि वीरेंद्र सेहवाग यांचे मिश्रण आहे. गेल्या वर्षी आयपीएल 2025 च्या मेगा लिलावातही शॉला कोणताही खरेदीदार मिळाला नाही. तो विकला गेला नाही आणि त्यानंतर कोणत्याही संघाने त्याला पर्याय म्हणून निवडले नाही.

पृथ्वी शॉ न्यूज 24 ला म्हणाला, "अनेक गोष्टी आहेत. कारण काय घडले हे मला माहिती आहे. मी समजू शकतो. मी आयुष्यात बरेच चुकीचे निर्णय घेतले आहेत. मी क्रिकेटला कमी वेळ देऊ लागलो. मी खूप सराव करायचो. उदाहरण देत सांगितले की, तो आधी नेटमध्ये 3-4 तास फलंदाजी करायचा. फलंदाजी करताना मला कधीच थकवा येत नव्हता. मी अर्धा दिवस मैदानावर असायचा. त्याने कबूल केल की लक्ष दुसरीकडे वळवले गेले आणि करिअर गेले."

तो पुढे म्हणाला, "त्यानंतर जे आवश्यक नव्हते ते महत्त्वाचे मानू लागलो. काही चुकीचे मित्र बनवले. कारण मी त्यावेळी अडचणीत होतो. मग त्यांनी मला काही ठिकाणी नेले. त्या सर्व गोष्टी झाल्या आणि मी ट्रॅकवरून हटलो. मी 8 तास मैदानावर सराव करायचो. आता 4 तासही घालवत नाही."