Ahmedabad Plane Crash: एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान गुरुवारी (12 जून) दुपारी अहमदाबाद विमानतळाजवळील मेघनानी नगर भागात, टेकऑफ झाल्यानंतर काही क्षणांतच कोसळले. विमानात एकूण 242 लोक होते, ज्यात 12 क्रू मेंबर्सचा समावेश होता. या अपघातात 241 लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर आता टाटा ग्रुपने जाहीर केले आहे की, अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. एअर इंडिया ही टाटा ग्रुपची मालकीची आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, ‘या कठीण काळात शब्द अपुरे पडत आहेत. ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत आणि जखमी झालेल्या कुटुंबांसोबत आमच्या संवेदना आहेत.’

जखमी प्रवाशांच्या उपचाराचा संपूर्ण खर्चही टाटा ग्रुप उचलेल आणि त्यांना आवश्यक असलेली सर्व वैद्यकीय सुविधा पुरवली जाईल. याशिवाय, अहमदाबादमधील बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या पुनर्बांधणीसाठीही टाटा ग्रुप मदत करेल. या कठीण काळात ते बाधित कुटुंबे आणि समुदायांसोबत खंबीरपणे उभे असल्याचे कंपनीने म्हटले आहे. (हेही वाचा: Ahmedabad Plane Crash: 'आम्ही Air India च्या संपर्कात आहोत'; अहमदाबाद अपघातावर विमान उत्पादक कंपनी Boeing Airplanes ची पहिली प्रतिक्रिया)

Ahmedabad Plane Crash: 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)