Partho Ghosh (फोटो सौजन्य - X/@shindeckant)

Partho Ghosh Passed Away: प्रसिद्ध बॉलीवूड चित्रपट निर्माते पार्थो घोष (Partho Ghosh) यांचे निधन झाले आहे. ही दुःखद बातमी येताच चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. ताज्या माहितीनुसार, हृदयाशी संबंधित गुंतागुंत पार्थो घोष यांचा मृत्यू झाला. सोमवार, 9 जून रोजी वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चित्रपट निर्मात्याच्या निधनाची पुष्टी अभिनेत्री ऋतुपर्णा सेनगुप्ता यांनी केली आहे. यासोबतच, त्यांच्या निधनावर एक भावनिक पोस्ट शेअर करून त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पार्थो घोष मड आयलंडमध्ये राहत होते.

अभिनेत्रीने वाहिली श्रद्धांजली -

अभिनेत्री ऋतुपर्णा सेनगुप्ता यांनी ज्येष्ठ चित्रपट निर्माते पार्थो घोष यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आणि लिहिले की, 'मला शब्दांत सांगता येणार नाही असे दुःख आहे. आज आम्ही एक असाधारण प्रतिभा, दूरदर्शी दिग्दर्शक आणि दयाळू माणूस गमावला आहे. पार्थो दा, तुम्ही पडद्यावर निर्माण केलेल्या जादूसाठी आम्हाला नेहमीच आठवण येईल. शांती लाभो.' (वाचा - Filmmaker Manish Gupta Booked: लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शक मनीष गुप्तावर ड्रायव्हरवर चाकू हल्ला केल्याचा आरोप; पगाराच्या वादातून घडली घटना, गुन्हा दाखल)

पार्थो घोष यांची चित्रपट कारकीर्द

चित्रपट निर्माते पार्थो घोष यांनी 1985 मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून चित्रपटसृष्टीत आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांचा पहिला दिग्दर्शनाचा चित्रपट '100 डेज' होता. या चित्रपटात जॅकी श्रॉफ आणि माधुरी दीक्षित यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट इटालियन कथेवरून रूपांतरित झालेल्या तमिळ क्लासिक चित्रपट 'नूरवथु नाल' चा हिंदी रिमेक होता. '100 डेज' ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

पार्थो घोष यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक सुपरस्टार कलाकारांचे चित्रपट दिग्दर्शित केले. यात दिव्या भारतीचा 'गीत', मिथुन चक्रवर्तीचा 'दलाल' आणि नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ आणि मनीषा कोइराला यांचा 'अग्नी साक्षी'चा समावेश आहे. त्यांनी एकूण 15 हून अधिक चित्रपट दिग्दर्शित केले. 2018 मध्ये प्रदर्शित झालेला 'मौसम इकरार के दो पल प्यार के' हा त्यांचा शेवटचा दिग्दर्शकीय चित्रपट होता.