IND vs ENG 1st Test 2025: करुण नायरची 8 वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन; 2 टेस्टमधील सर्वाधिक अंतर असलेल्या टॉप 5 भारतीय खेळाडूंची यादी पाहा!

करुण नायर (Karun Nair) जवळजवळ 8 वर्षांनी भारतीय संघात परतला आहे. नायरने 2017 मध्ये भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर आता तो इंग्लंडविरुद्ध पुनरागमन करत आहे. नायरने या 8 वर्षात 77 कसोटी सामने गमावले आहेत. दोन कसोटी सामने खेळण्यात सर्वात जास्त अंतर असलेल्या पाच भारतीय खेळाडूंची यादी येथे आहे.

Karun Nair (Photo Credit- X)

India National Cricket Team vs England National Cricket Team: भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना शुक्रवारपासून खेळला जात आहे. करुण नायर (Karun Nair) जवळजवळ 8 वर्षांनी भारतीय संघात परतला आहे. नायरने 2017 मध्ये भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर आता तो इंग्लंडविरुद्ध पुनरागमन करत आहे. नायरने या 8 वर्षात 77 कसोटी सामने गमावले आहेत. दोन कसोटी सामने खेळण्यात सर्वात जास्त अंतर असलेल्या पाच भारतीय खेळाडूंची यादी येथे आहे. (हे देखील वाचा: IND vs ENG 1st Test 2025: पहिल्या कसोटी सामन्यात भारत-इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या काय आहे कारण)

दोन कसोटी सामने खेळण्यात सर्वात जास्त अंतर असलेले 5 भारतीय खेळाडू

1. जयदेव उनाडकट

वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने भारतासाठी दोन कसोटी सामने खेळण्यात सर्वात जास्त अंतर ठेवले आहे. उनाडकटने भारतासाठी 118 कसोटी सामने गमावले होते. 2010 नंतर 12 वर्षांनी उनाडकटला 2022 मध्ये कसोटी खेळण्याची संधी मिळाली.

2. दिनेश कार्तिक

भारतीय विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकने भारतासाठी87 कसोटी सामने गमावले. 2010 नंतर 8 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर कार्तिकने 2018 मध्ये कसोटी सामना खेळला.

3. पार्थिव पटेल

यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल 2008 मध्ये टीम इंडियाच्या बाहेर होता. त्यानंतर त्याला भारताकडून खेळण्यासाठी 8 वर्षे वाट पहावी लागली. त्यानंतर पार्थिवने 2016 मध्ये भारतासाठी एक कसोटी सामना खेळला. या काळात त्याने 83 कसोटी सामने गमावला.

4. करुण नायर

भारतीय फलंदाज करुण नायर आता 2017 नंतर खेळताना दिसेल. या आठ वर्षांत तो भारतासाठी 77 कसोटी सामने गमावले. या काळात त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी केली. त्यानंतर तो आता संघात पुनरागमन करत आहे.

5. अभिनव मुकुंद

भारतीय फलंदाज अभिनव मुकुंद 2011 मध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मधून बाहेर होता. त्यानंतर, त्याला संघात स्थान मिळवण्यासाठी 6 वर्षे लागली. 2017 मध्ये मुकुंदला पुन्हा संधी मिळाली. या काळात मुकुंद भारतासाठी 56 कसोटी सामन्यांना मुकला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement