India Beat England 2nd Test: एजबेस्टनमध्ये भारताचा 6 दशकांनंतर ऐतिहासिक विजय: इंग्लंडला 336 धावांनी धूळ चारली, मालिकेत 1-1 बरोबरी!
IND vs ENG 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) शानदार विजय नोंदवला आहे. या विजयासह भारताने इंग्लंडचा 336 धावांनी दारुण पराभव करत एजबेस्टनवर 6 दशकांनंतर ऐतिहासिक विजय मिळवला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
India National Cricket Team vs England National Cricket Team: बर्मिंगहॅममधील एजबेस्टन (Edgbaston) मैदानावर 2 जुलैपासून खेळल्या गेलेल्या भारत (India) आणि इंग्लंड (India vs England 2nd Test) यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) शानदार विजय नोंदवला आहे. या विजयासह भारताने इंग्लंडचा 336 धावांनी दारुण पराभव करत एजबेस्टनवर 6 दशकांनंतर ऐतिहासिक विजय मिळवला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने पहिल्या डावात 151 षटकांत सर्व गडी गमावून 587 धावांचा डोंगर उभा केला.
शुभमन गिलची 269 धावांची संस्मरणीय खेळी
भारताकडून कर्णधार शुभमन गिलने (Shubman Gill) 269 धावांची संस्मरणीय खेळी केली. त्याला यशस्वी जयस्वालने 87 आणि रवींद्र जडेजाने 89 धावांचे मोलाचे योगदान दिले. इंग्लंडसाठी शोएब बशीरने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. (हे देखील वाचा: Shubman Gill Michael Vaughan: मायकल वॉनचं गिल अँड कंपनीला आव्हान; 'कोहलीने जे एकट्याने केलं, ते करून दाखवा!')
इंग्लंडचे प्रत्युत्तर आणि भारताची आघाडी
भारताच्या विशाल धावसंख्येला प्रत्युत्तर देण्यासाठी आलेल्या इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात सर्वबाद 407 धावा केल्या, त्यामुळे भारताला 180 धावांची भक्कम आघाडी मिळाली. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने 158 आणि जेमी स्मिथने 184 धावांची अप्रतिम खेळी साकारली. भारताकडून गोलंदाजीत मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) 6 आणि आकाश दीपने (Akash Deep) 4 विकेट घेऊन इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडले.
भारताचा दुसरा डाव आणि विशाल लक्ष्य
त्यानंतर चौथ्या दिवशी टीम इंडियाने आपला दुसरा डाव 427 धावांवर घोषित केला. भारताकडे आधीच 180 धावांची आघाडी असल्यामुळे इंग्लंडला विजयासाठी 608 धावांचे विशाल लक्ष्य मिळाले. दुसऱ्या डावातही कर्णधार शुभमन गिलने 169 धावांची शानदार खेळी करत आपले वर्चस्व सिद्ध केले. त्याला ऋषभ पंतने (Rishabh Pant) 65 आणि रवींद्र जडेजाने 69 धावांचे योगदान दिले.
इंग्लंडचा डाव गडगडला, भारताचा विजय निश्चित
608 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडचा संघ केवळ 271 धावांवर ऑल आऊट झाला. इंग्लंडकडून जेमी स्मिथने 88 धावा करत काही काळ प्रतिकार केला. मात्र, भारताकडून आकाश दीपने सर्वाधिक 6 विकेट घेत इंग्लंडचा डाव लवकर संपवला आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह भारतीय संघाने मालिकेतील आव्हान कायम राखले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)