IND vs ENG 3rd D/N Test: ‘मोटेराची खेळपट्टी आव्हानात्मक, खेळण्यासाठी योग्य की नाही ICC ने घ्यावा निर्णय’, पराभवानंतर जो रूटची प्रतिक्रिया

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघाने अवघ्या 2 दिवसात 10 विकेटने जबरदस्त विजय मिळवला. या सामन्यात टॉस जिंकूनही इंग्लिश टीम त्याचा फायदा घेण्यात अपयशी ठरले. पहिल्या डावात 112 तर दुसऱ्या डावात अवघ्या 81 धावांवर इंग्लंडचा डाव संपुष्टात आला. मात्र, दोन दिवसात कसोटी सामन्याचा निकाल लागल्यानाने आता खेळाचे जाणकार खेळपट्टीवर टीका करत आहेत.

जो रूट, (Photo Credit: Twitter/englandcricket)

IND vs ENG 3rd D/N Test: अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघाने (Indian team) अवघ्या 2 दिवसात 10 विकेटने जबरदस्त विजय मिळवला. या सामन्यात टॉस जिंकूनही इंग्लिश टीम त्याचा फायदा घेण्यात अपयशी ठरले. पहिल्या डावात 112 तर दुसऱ्या डावात अवघ्या 81 धावांवर इंग्लंडचा डाव संपुष्टात आला ज्यामुळे यजमान संघाचा विजय सुकर झाला. मात्र, दोन दिवसात कसोटी सामन्याचा निकाल लागल्यानाने आता खेळाचे जाणकार खेळपट्टीवर टीका करत आहेत. या सर्वांना उत्तर देत इंग्लिश संघाचा कर्णधार जो रूटने म्हटले की मोटेरा पिच क्रिकेटसाठी योग्य आहे की नाही, याचा निर्णय खेळाडू नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलचे (International Cricket Council) कार्य आहे. इंग्लंडच्या (England) पराभवासाठी खेळपट्टीला दोष देणे कर्णधार रूटला अयोग्य वाटले. पण त्याने म्हणाले की, आयसीसीनेच कसोटी क्रिकेटच्या खेळपट्टीच्या उपयुक्ततेचा विचार केला पाहिजे. (IND vs ENG 3rd D/N Test: पहिल्यांदा नाही, दोनच दिवसात विजय मिळवण्याची Team India ची दुसरी वेळ, पहा कोण होता पहिली टीम)

“मला वाटते की ही खेळपट्टी, ही एक अतिशय आव्हानात्मक आहे, खेळणे खूप कठीण आहे. तो उद्देशाने योग्य आहे की नाही हे खेळाडूंनी ठरवायचे नाही आणि ते आयसीसीचे काम आहे,” भारताच्या पहिल्या डावात कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट पाच विकेट्स घेणाऱ्या रूटने म्हटले. ते पुढे म्हणाले, "खेळाडू म्हणून आम्ही प्रयत्न करु आणि आपल्या समोर जे आहे त्याचा शक्य तितका प्रतिकार करू,” रूटने पुढे म्हटले. रूट म्हणाला की त्याच्या संघाने प्रथम डावातील मोठी धावसंख्या मिळविण्याची संधी गमावली, जेव्हा फक्त दोन विकेट्स गमावून त्यांनी 70 धावा केल्या होत्या. “आम्ही निराश झालो आहोत, मला वाटते की आम्ही पहिल्या डावात अधिक संधी गमावली. 71/2 वेळी आम्ही ज्या स्थितीत आहोत त्या स्थितीत आम्हाला मोठी संधी मिळाली. आम्ही पहिल्या डावात जर 250 धावा जरी केल्या असत्या तरी या सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. पण, आम्ही केवळ 112 धावा केल्याने आमच्या सामना जिंकण्याच्या बऱ्याच आशा तिथेच संपुष्टात आल्या. आम्ही भारताला दुसऱ्या डावात 145 धावांत ऑलआऊट केले मात्र, दुसऱ्या डावातही फलंदाजांनी शरणागती पत्करल्याने आम्हाला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.”

दुसरीकडे, हरभजन सिंह आणि व्हीव्हीएस लक्ष्मणसह अनेक माजी खेळाडूंनी मोटेराची फिरणारी खेळपट्टी कसोटी क्रिकेटसाठी उपयुक्त नसल्याचे म्हटले परंतु, अनुभवी सुनील गावस्कर यांनी भिन्न मत व्यक्त केले. गावस्कर म्हणाले की, अत्यंत बचावात्मक वृत्तीमुळे फलंदाजांनी विकेट गमावल्या आणि त्यातील बहुतेक सरळ चेंडूंवर बाद झाले. त्याचवेळी माजी फलंदाज लक्ष्मण म्हणाला, "कसोटी सामन्यासाठी ही एक आदर्श खेळपट्टी नव्हती. इतकंच नाही तर भारतीय फलंदाजही चालले नाही."

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now