Shahu Maharaj Birth Anniversary: समाजसुधारक आणि कोल्हापूरच्या भोसले घराण्याचे राजा शाहू महाराज यांच्याबद्दलची 'हे' मनोरंजक तथ्य जाणून घ्या

भोसले घराण्याचे शाहू महाराज हे कोल्हापूर राज्यातील भारतीय राजा होते. शाहू महाराजांचा जन्म घाटगे मराठी कुटुंबात जयसिंगराव आणि राधाबाई यांच्या घरी 26 जून 1874 रोजी झाला. 1894 मध्ये त्यांनी कोल्हापूरचा राजभार सांभाळला 1922 मध्ये मृत्यूपर्यंत त्यांनी राज्य केले.

शाहू महाराज, भोसले घराण्याचे राज्यकर्ते (Photo Credits: Wikimedia Commons)

भोसले घराण्याचे (Bhosle Dynasty) शाहू महाराज (Shahu Maharasj) हे कोल्हापूर (Kokhapur) राज्यातील भारतीय राजा होते. शाहू महाराजांचा जन्म घाटगे मराठी कुटुंबात जयसिंगराव आणि राधाबाई यांच्या घरी 26 जून 1874 रोजी झाला. शाहू यांचे वडील गाव प्रमुख होते, तर त्यांची आई मुधोळच्या राजघराण्यातील सदस्या होत्या. 1894 मध्ये त्यांनी कोल्हापूरचा राजभार सांभाळला 1922 मध्ये मृत्यूपर्यंत त्यांनी राज्य केले. शाहू महाराजांचे सुरुवातीचे शिक्षण 10 वर्षापर्णात त्यांच्या वडिलांनी सांभाळले. त्यानंतर त्यांना कोल्हापूरच्या राजा शिवाजी चतुर्थच्या (King Shivaji IV) विधवा राणी आनंदीबाई यांनी दत्तक घेतले. राजकुमार महाविद्यालय, राजकोट येथून त्यांनी शिक्षण घेतले. शाहू यांनी सर स्टुअर्ट फ्रेझरकडून प्रशासकीय कामकाजाचे धडे घेतले जे भारतीय नागरी सेवेचे (Indian Civil Service) प्रतिनिधी होते. (Shahu Maharaj Jayanti 2020 Images: राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त Wishes, Messages, Whatsapp Status शेअर करून करा छत्रपती शाहूच्या स्मृतीस अभिवादन!)

राजा झाल्यानंतर त्यांचे नामकरण छत्रपती शाहूजी महाराज असे झाले. जेव्हा राजघराण्यातील ब्राह्मण पुजारींनी ब्राह्मणेतरांचे संस्कार करण्यास नकार दिला, तेव्हा शाहूने तरुण मराठाला धार्मिक शिक्षक म्हणून नियुक्त केले आणि क्षत्र जगद्गुरू ही पदवी दिली. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक सामाजिक कामही सुरू केली. शाहू महाराजांनी निम्न जातींच्या उन्नतीसाठी काम केले. कोल्हापूरचा राजा या नात्याने राजघराण्यातील विद्यार्थ्यांना रोजगार मिळायला हवा याची त्यांनी काळजी घेतली. शाहू महाराज पहिले शासक होते ज्यांनी समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी 50 टक्के आरक्षण देऊन सकारात्मक कृती कार्यक्रम सुरू केले. यासंदर्भात त्यांनी 1902 मध्ये जाहीरनामाच पास केला.

1906 मध्ये शाहू छत्रपती विणकाम आणि स्पिनिंग मिल सुरू केली आणि राजाराम महाविद्यालयही बांधले. शाहू महाराजांनीही समाजातील अस्पृश्यता दूर करण्याचही काम केले. डॉ भीमराव आंबेडकर शाहूंनी प्रेरित केले होते. दोघांचे खूप मैत्रीपूर्ण बंध होते. शाहू महाराजांच्या सकारात्मक कार्यक्रमांमुळे प्रेरणा घेऊन आंबेडकर यांनी भारतीय वेशभुषामध्ये अनुच्छेद 46 समाविष्ट केले. 1891 मध्ये शाहूने लक्ष्मीबाई खानविलकरशी लग्न केले. त्यांची चार मुलं होती. 6 मे, 1922 रोजी छत्रपती शाहूजी महाराज यांचे निधन झाले. त्यांच्यानंतर त्यांचा मोठा मुलगा राजाराम तिसरा याने राज केले. दुर्दैवाने, त्यांच्या सुधारणा ढासळल्या आणि त्यांचे वारस पुढे त्यांचा वारसा पुढे नेऊ शकले नाहीत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now