मध्य प्रदेश: कमलनाथ सरकार पडले, खलनायक कोण ठरले? कमलनाथ, ज्योतिरादित्य सिंधिया, शिवराज सिंह चौहान की दिग्विजय सिंह?

मध्य प्रदेशच्या राजकारणात 7 व्यक्ती प्रमुख भूमिका करताना दिसल्या. यात ज्योतिरादित्य सिंधिया, शिवराज सिंह चौहान, कमलनाथ, दिग्विजय सिंह, जफर इस्लाम, नरोत्तम मिश्रा और नरेंद्र सिंह तोमर यांचा समावेश केला जातो. या संपूर्ण नाट्यात काँग्रेस पक्षाला जबरदस्त धक्का बसला. इतका की त्यांच्यावर सत्ता गमवण्याचीच वेळ आली.

Kamal Nath, Jyotiraditya Scindia, Shivraj Singh Chauhan, Digvijay Singh | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Madhya Pradesh Political Drama: मध्य प्रदेश राज्यात गेले 17 दिवस सुरु असलेले राजकीय नाट्य अखेर संपले. कमलनाथ (Kamal Nath) यांच्या नेतृत्वाखाली असलेले काँग्रेस सरकार पडण्यात अखेर या नाट्याचा शेवट झाला. या नाट्याच्या सर्व अंकांमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia), शिवराज सिंह चौहान ( Shivraj Singh Chauhan) आणि कमलनाथ हे प्रमुख भूमिकेत दिसले. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांनाही या सत्तानाट्यात प्रमुख मानले गेले. प्रत्येकाने आपापली भूमिका पार पाडण्याचा निकराने प्रयत्न केला. यात भाजप यशस्वी झाला. काँग्रेस अपयशी ठरला. त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये सत्तांतर होऊन पुन्हा एकदा भारतीय जतना पक्ष सत्तेवर येण्याची आणि काँग्रेस विरोधी पक्षात बसणे जवळपास निश्चित झाले आहे. दरम्यान, मध्य प्रदेश आणि देशाच्या राजकारणात सध्या चर्चा सुरु आहे की, या राजकीय नाट्यात नेमके खलनायक कोण ठरले.

मध्य प्रदेशच्या राजकारणात 7 व्यक्ती प्रमुख भूमिका करताना दिसल्या. यात ज्योतिरादित्य सिंधिया, शिवराज सिंह चौहान, कमलनाथ, दिग्विजय सिंह, जफर इस्लाम, नरोत्तम मिश्रा और नरेंद्र सिंह तोमर यांचा समावेश केला जातो. या संपूर्ण नाट्यात काँग्रेस पक्षाला जबरदस्त धक्का बसला. इतका की त्यांच्यावर सत्ता गमवण्याचीच वेळ आली.

ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या राजीनाम्याला संघर्षाची किनार

मध्य प्रदेश निवडणूक 2018 मध्ये काँग्रेसने ज्योतिरादित्य सिंधिया यांना पहिल्या फळीत उतरवले. ज्यामुळे त्यांनी प्रचारातही आघाडी घेतली. त्यामुळे ज्योतिरादित्य यांच्यावरच मुख्यमंत्री पदाची धुरा सोपवली जाईल, असे सर्वांनाच वाटत होते. पण, ऐन वेळी काँग्रेस पक्षाने कमलनाथ यांचे नाव जाहीर केले. ज्योतिरादित्य सिंधिया यांना डावलण्यात आले. तेव्हापासून ते नाराजच होते. काही लोक सांगतात की राज्यसभेवर जाण्यासाठीच ज्योतिरादित्य सिंधिया यांनी हा निर्णय घेतला.

ज्योतिरादित्य सिंधिया यांना मध्य प्रदेश काँग्रेस अध्यक्षप देण्याचीही चर्चा सुरु झाली. पण, तेही घडले नाही. पुढे राज्य सभा निवडणुकीसाठी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या ऐवजी दिग्विजय सिंह यांचे नाव पुढे आले. त्यामुळे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पक्षच बदलण्याचा निर्णय घेतला, अशी चर्चा आहे. 10 मार्च या दिवशी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पक्षाचा राजीनामा दिला आणि 11 मार्च या दिवशी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काहीच तासांत भाजपने त्यांना राज्यसभा उमेदवारी दिली. (हेही वाचा, कमलनाथ यांचा राजीनामा,कॉंग्रेस चे सरकार कोसळले; मध्य प्रदेश मध्ये ऑपरेशन लोटस 15 महिन्यातच यशस्वी)

कमलनाथ

दरम्यान, या सर्वात गेली 40 वर्षे छिंदवाडा येथून लोकसभा सदस्य राहिलेले कमल नाथ राज्यात येऊन मुख्यमंत्री बनले. परंतू, त्यांना 15 महिन्यांच्या आतच राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे या नाट्यातील ते सर्वात मोठे पराभूत ठरले.

शिवाज सिंह चौहान

गेली 15 वर्षे मध्य प्रदेशच्या राजकारणात राहिलेले शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील सरकार 2018 मध्ये पराभूत झाले. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. त्यांना केंद्रात पाठविण्याची चर्चा सुरु झाली मात्र, त्यांनी राज्यातच राहणे पसंत केले. अखेर त्यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांना सोबत घेऊन सत्तापालट केला.

दिग्विजय सिंह

मध्य प्रदेशच्या सत्तानाट्यात कमलनाथ यांना व्हिलन मानले गेले. ज्योतिरादित्य हे भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी ज्या आमदारांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होत राहिली त्यात 6 आमदार हे काँग्रेसचे होते. त्यातील 2 दिग्विजय सिंह यांच्या जवळचे होते. हे दोघेही मध्यप्रदेशमध्ये दिग्विजय यांचे सरकार असताना मंत्री होते. कमलनाथ यांन या दोघांनाही सरकारमध्ये स्थान दिले नाही. दरम्यान, कमलनाथ सरकारमधील उमंग सिंघार या आमदाराने ट्विट करुन म्हटले की, हा सर्व खेळ राज्यसभा उमेदवारी मिळविण्यासाठी आहे. बाकी आपण सर्व जाणताच. म्हणजेच या ट्विटमधून दिग्विजय सिंह यांनाच व्हिलन ठरविण्यात आले.

मूळात मध्य प्रदेशच्या राजकारणामध्ये सर्वात मोठा भूकंप आला तो म्हणजे ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या राजीनाम्यामुळे. ज्योतिरादित्य यांनी कमलनाथ यांच्या मंत्रिमंडळ आणि काँग्रेस पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला. या राजीनाम्यामुळे काँग्रेस पक्षासमोरील चिंता आणि राज्याच्या राजकारणातील गुंता अधिकच वाढत गेला. पुढे तर ज्योतिरादित्य सिंधिया समर्थक आमदारांनीही राजीनामे दिले. ज्यामुळे पेचच निर्माण झाला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now