Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याच्या 'निष्पक्ष' चौकशीसाठी पाकिस्तान तयार; घाबरगुंडी उडालेल्या शाहबाज शरीफ यांचे महत्त्वाचे विधान

भारताच्या कठोर भूमिकेदरम्यान, शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या जबाबदार भूमिकेचा पुनरुच्चार केला. त्यांनी म्हटलं की, 'आम्ही कोणत्याही निष्पक्ष आणि विश्वासार्ह चौकशीत सहभागी होण्यास तयार आहोत, जर ती पारदर्शक असेल.'

Pakistan PM Shahbaz Sharif (फोटो सौजन्य - फेसुबक)

Pahalgam Terror Attack: भारताच्या तीव्र प्रतिक्रियेमुळे आणि आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Pakistan PM Shahbaz Sharif) यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. पहलगाम हल्ल्याच्या (Pahalgam Attack) निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशीसाठी पाकिस्तान तयार असल्याचं शरीफ यांनी म्हटलं आहे. हल्लेखोर पाकिस्तामधील असल्याचा संशय व्यक्त केल्यानंतर शाहबाज शरीफ यांचे हे विधान समोर आले आहे. भारताच्या कठोर भूमिकेदरम्यान, शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या जबाबदार भूमिकेचा पुनरुच्चार केला. त्यांनी म्हटलं की, 'आम्ही कोणत्याही निष्पक्ष आणि विश्वासार्ह चौकशीत सहभागी होण्यास तयार आहोत, जर ती पारदर्शक असेल.'

या हल्ल्यानंतर, भारताने एकतर्फी सिंधू पाणी करार (IWT) स्थगित केला असून पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. त्याच वेळी, पाकिस्तानने सिमला करार रद्द केला आणि भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले. भारताच्या या पावलांनंतर पाकिस्तानमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, आता शाहबाज शरीफ हल्ल्याच्या चौकशीला तयार असल्याचं सांगून आंतरराष्ट्रीय समुदायात पाकिस्तानची विश्वासार्हता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. (हेही वाचा -Pahalgam Terror Attack: पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे Air India, IndiGo च्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम; निवेदन जारी, दिली प्रवासाचे पुनर्नियोजन आणि परताव्याची सुविधा)

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी म्हटलं आहे की, भारताने कोणताही ठोस तपास किंवा पुरावा न घेता पाकिस्तानवर आरोप केले आहेत. आम्ही नेहमीच दहशतवादाविरुद्ध उभे राहिलो आहोत आणि त्याची मोठी किंमत मोजली आहे. दहशतवादाविरुद्धच्या युद्धात पाकिस्तानच्या लोकांनी 90 हजार हून अधिक लोकांचे प्राण गमावले आहेत. यात आमचे 600 अब्ज डॉलर्सचे आर्थिक नुकसान झाले आहे.' (हेही वाचा -Devendra Fadnavis on Pakistani Nationals: पाकिस्तानी कलाकार आणि खेळाडूंबद्दल सहानुभूती नाही; मुख्यमंत्र्यांनी सुरू केली पाकिस्तानींना हाकलून लावण्याची तयारी)

दरम्यान, भारताच्या आरोपांना न जुमानता, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी पुन्हा एकदा दावा केला की, पाकिस्तान दहशतवादाविरुद्ध कठोर आहे आणि कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी हल्ल्यांचा निषेध करतो. शाहबाज शरीफ यांच्या विधानावरून असेही सूचित होते की, पाकिस्तानला आशा आहे की आंतरराष्ट्रीय समुदाय या मुद्द्यावर दबाव कायम ठेवेल जेणेकरून योग्य आणि निष्पक्ष चौकशी करून निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement