IPL 2022: रोहित शर्मा याच्या ‘कॅप्टन्सी’वर माजी क्रिकेटपटूने साधला निशाणा, म्हणाले - ‘Virat Kohli प्रमाणेच पाऊल उचलेल असे वाटले’; वाचा सविस्तर

IPL 2022: विराट कोहलीने गेल्या वर्षी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोचा कर्णधार म्हणून पायउतार होणार असल्याची घोषणा करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. कोहलीचा आरसीबी कर्णधार म्हणून रेकॉड चांगला नसताना, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याच मार्गावर जाऊ शकतो आणि किरॉन पोलार्डकडे नेतृत्व सोपवू शकतो, असे विचार आल्याची कबुली भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी दिली.

विराट कोहली आणि रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

IPL 2022: विराट कोहलीने (Virat Kohli) गेल्या वर्षी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोचा (Royal Challengers Bangalore) कर्णधार म्हणून पायउतार होणार असल्याची घोषणा करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. कोहलीचा आरसीबी (RCB) कर्णधार म्हणून रेकॉड चांगला नसताना, मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच मार्गावर जाऊ शकतो आणि किरॉन पोलार्डकडे (Kieron Pollard) मुंबई इंडियन्स नेतृत्व सोपवू शकतो, असे विचार आल्याची कबुली भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी दिली. इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 मध्ये मुंबईचा संघ फारसा फॉर्ममध्ये दिसत नाहीये. पाच वेळा आयपीएल (IPL) चॅम्पियन संघाने पहिले चारही सामने गमावले असून आज पाचवा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यापूर्वी मांजरेकर म्हणाले की, मला वाटले होते की रोहितही विराटप्रमाणे आयपीएलमधील कर्णधारपद सोडेल, पण तसे झाले नाही. (IPL 2022: मुंबईविरुद्ध Virat Kohli याच्या विवादित LBW वर RCB ने दिलं स्पष्टीकरण, ट्विट करून सांगितला MCC चा नियम)

“मला वाटते पोलार्ड अजूनही मूल्य वाढवतो. हंगामापूर्वी मला असेही वाटले की विराट कोहलीप्रमाणे रोहित शर्मा कॅप्टन्सी सोडेल, थोडा आराम करेल, शुद्ध फलंदाज म्हणून खेळेल आणि पोलार्डकडे जबाबदारी सोपवेल जो एक चमकदार आंतरराष्ट्रीय कर्णधार आहे,” मांजरेकर ESPNCricinfo वर म्हणाले. याशिवाय मुंबई इंडियन्ससाठी आणखी फलंदाजांनाही कामगिरी करावी लागेल असा विश्वास मांजरेकर यांनी व्यक्त केला. मुंबई संघासाठी सध्या केवळ सूर्यकुमार यादवने वेगवान खेळ केल्याने काहीही होणार नाही. पोलार्डवर आपला पूर्ण विश्वास असून दबावाच्या सामन्यात तो चांगली कामगिरी करेल, पण त्याला तिथे पोहोचायचे आहे आणि तो पोलार्डच्या वर नाही, असेही मांजरेकर म्हणाले.

दरम्यान, आयपीएलच्या 2022 हंगामात आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात असलेली मुंबई इंडियन्स बुधवारी पंजाब किंग्ज संघाशी भिडणार आहे. मोसमातील आपला पहिला विजय नोंदवण्यासाठी आणि आपल्या मोहिमेला सुरुवात करण्यासाठी मुंबई उत्सुक असेल. हा सामना मुंबई संघासाठी खूप महत्त्वाचा असेल कारण हा सामना जर संघाने जिंकला नाही, तर प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी त्यांना उर्वरित नऊ सामन्यांपैकी किमान आठ सामने जिंकावे लागतील. या मोसमात आतापर्यंत एकही सामना जिंकलेला मुंबई इंडियन्स हा एकमेव संघ आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement