IND vs BAN Test Series 2024: बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची कधी होणार घोषणा? मोठे अपडेट आले समोर

IND vs BAN: भारताला पुढील महिन्यात 19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ही मालिका सुरू व्हायला अजून बराच अवधी आहे. अशा स्थितीत बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ कधी जाहीर होणार, असे प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण होत आहेत.

Team India (Photo Credit - X)

India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारतीय संघ सध्या विश्रांतीवर आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या फॉरमॅट मालिकेनंतर भारतीय संघ आता थेट पुढच्या महिन्यात मैदानात उतरणार आहे. भारताला पुढील महिन्यात 19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध (IND vs BAN Test Series) दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ही मालिका सुरू व्हायला अजून बराच अवधी आहे. अशा स्थितीत बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ कधी जाहीर होणार, असे प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण होत आहेत. आज आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहोत आणि बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केव्हा केली जाईल हे सांगू. (हे देखील वाचा: India vs England 2025 Test Series Schedule Announced: पुढील वर्षी कसोटीत भारतीय संघ भिडणार इंग्लंडशी, बीसीसीआयकडून वेळापत्रक जाहीर)

कधी होणार भारतीय संघाची घोषणा?

अलीकडेच, इनसाइडस्पोर्टशी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने भारतीय संघाच्या घोषणेबाबत मोठी माहिती शेअर केली आहे. तो म्हणाला, 'कसोटी संघ जवळजवळ तयार आहे. फक्त दोन, तीन जागा भरण्याचा मुद्दा आहे. अजित आगरकर आणि त्यांची टीम दुलीप ट्रॉफी पाहतील आणि त्यातील काही जागा भरण्याचा प्रयत्न करतील. विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहेत. हे नवीन चक्र असून ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी त्यांना लाल चेंडूने खेळायचे आहे.

बुमराहला विश्रांती मिळण्याची शक्यता

आणखी एक मोठी माहिती देताना बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 'अजून उन्हाळा नाही, त्यामुळे मला वाटत नाही की खेळपट्टी फार कोरडी असेल आणि त्यावर आणखी वळणे येतील. पाऊस पडू शकतो आणि खेळपट्टी ओलसर असणे अपेक्षित आहे. खेळपट्टीचा फायदा वेगवान गोलंदाजांना होऊ शकतो. जसप्रीत बुमराहच्या बाबतीत तो न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून पुनरागमन करेल. आमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची कसोटी मालिका येत आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीवरून हे स्पष्ट झाले आहे की, बीसीसीआय दुलीप ट्रॉफीच्या मध्यावर बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करू शकते. बांगलादेशविरुद्ध कोणत्या खेळाडूंना संधी मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now