ICC Cricket World Cup 2023: टीम इंडियाच्या 'या' दोन महान खेळाडूंकडे इतिहास रचण्याची सुवर्णसंधी, करु शकतात मोठा विक्रम नावावर

यजमान संघ असल्याने टीम इंडिया विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून आपले आव्हान सादर करेल. त्याचबरोबर पाकिस्तान आणि श्रीलंका यांसारखे संघही आशियाई परिस्थितीचा फायदा घेऊ इच्छितात. आगामी विश्वचषकातही काही महत्त्वाचे विक्रम धोक्यात येणार आहेत.

Team India (Photo Credit - Twitter)

आयसीसी पुरुष विश्वचषक 2023 (ICC Cricket World Cup 2023) 5 ऑक्टोबरपासून भारतीय भूमीवर सुरू झाला आहे. यावेळी विश्वचषकात 10 संघ सहभागी होत आहेत. क्रिकेटच्या महाकुंभासाठी सर्वच संघ खूप उत्सुक आहेत. या स्पर्धेतील सर्वात मोठा आणि बहुप्रतिक्षित सामना 14 ऑक्टोबर रोजी टीम इंडिया आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दोन्ही संघांमधील ही रोमांचक लढत पाहायला मिळणार आहे. यावर्षी एकदिवसीय विश्वचषक भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खेळवला जात आहे. यजमान संघ असल्याने टीम इंडिया विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून आपले आव्हान सादर करेल. त्याचबरोबर पाकिस्तान आणि श्रीलंका यांसारखे संघही आशियाई परिस्थितीचा फायदा घेऊ इच्छितात. आगामी विश्वचषकातही काही महत्त्वाचे विक्रम धोक्यात येणार आहेत.

विराट कोहली आणि आर अश्विनला दोन विश्वचषक जिंकण्याची संधी

जर टीम इंडिया या वर्षीचा विश्वचषक जिंकण्यात यशस्वी ठरली तर विराट कोहली आणि आर अश्विन हे दोन वनडे विश्वचषक जिंकणारे पहिले भारतीय खेळाडू बनतील. असे आतापर्यंत कधीच घडले नाही. 2011 नंतर विराट कोहली 2015 आणि 2019 च्या विश्वचषकाचा भाग होता, पण टीम इंडिया त्यात फार काही करू शकली नाही.

तर आर अश्विनने 2011 चा विश्वचषक खेळला होता आणि त्यानंतर 2015 च्या विश्वचषकातही त्याचा टीम इंडियात समावेश करण्यात आला होता. पण 2019 च्या विश्वचषकात आर अश्विन संघात नव्हता. अक्षर पटेल पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यास अश्विनला संधी दिली जाऊ शकते, असा अंदाज आधीच वर्तवला जात होता. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत आर अश्विनला संधी देण्यात आली होती. (हे देखील वाचा: ICC Cricket World Cup 2023: ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरण्यापूर्वी भारतीय संघाने नेटमध्ये गाळला घाम, आयसीसीने व्हिडिओ केला शेअर)

आर अश्विन प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळला आणि त्याने चांगली कामगिरी केली. टीम इंडिया जेव्हा फिरकीच्या ट्रॅकवर खेळते तेव्हा आर अश्विन खूप मारक ठरू शकतो. आता विराट कोहली आणि आर अश्विन टीम इंडियासाठी इतिहास रचण्यात यशस्वी ठरतात की त्यांनाही वाट पाहावी लागेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement