IND vs AUS 4th Test 2024: मेलबर्न कसोटी पराभवानंतर रोहित शर्मा दिलं स्पष्टीकरण, काय म्हणाला घ्या जाणून...
डब्ल्यूटीसी फायनलच्या पॉइंट टेबलमध्येही (WTC Point Table) भारताला धक्का बसला आहे. या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माही (Rohit Sharma) खूप निराश दिसत होता. मेलबर्नमधील पराभवानंतर रोहित शर्माचे मोठे वक्तव्य समोर आले आहे
India National Cricket Team vs Australian Men's Cricket Team: मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून 184 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे टीम इंडिया (Team India) आता मालिकेत 2-1 ने पिछाडीवर आहे. याशिवाय डब्ल्यूटीसी फायनलच्या पॉइंट टेबलमध्येही (WTC Point Table) भारताला धक्का बसला आहे. या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माही (Rohit Sharma) खूप निराश दिसत होता. मेलबर्नमधील पराभवानंतर रोहित शर्माचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. (हे देखील वाचा: WTC Points Table: मेलबर्न कसोटी पराभवानंतर टीम इंडियाला मोठा फटका, ऑस्ट्रेलियाने घेतली मोठी झेप; डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पोहचणे कठीण)
पराभवानंतर रोहितने काय दिले स्पष्टीकरण?
चौथ्या कसोटीतील पराभवानंतर रोहित पत्रकार परिषदेत म्हणाला, “आज मी जिथे उभा होतो तिथे उभा आहे, कर्णधार आणि फलंदाज म्हणून काही निकाल आमच्या बाजूने लागले नाहीत, हे निराशाजनक आहे. "मानसिकदृष्ट्या हे चिंताग्रस्त झाले आहे परंतु आत्तापर्यंत, काही गोष्टी आहेत ज्या मला एक संघ म्हणून पाहण्याची आवश्यकता आहे."
जसप्रीत बुमराहला मिळाली नाही साथ
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सुरू झाल्यापासून जसप्रीत बुमराह वगळता अन्य कोणताही भारतीय गोलंदाज काही विशेष करू शकलेला नाही. जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा एकटाच सामना करत असल्याचे दिसते. याबाबत रोहित शर्मा म्हणाला की, बुमराह एकदम हुशार आहे, आम्ही त्याला अनेक वर्षांपासून पाहत आहोत, तो इथे येऊन आमच्यासाठी काम मिळवतो आहे, त्याला फक्त देशासाठी खेळायचे आहे आणि संघासाठी चांगले करायचे आहे, पण दुर्दैवाने त्याला दुसऱ्या बाजूने फारसा पाठिंबा मिळाला नाही.”
कुठल्याही परिस्थितीत सिडनी सामना जिंकावा लागेल
सिडनी सामन्याबाबत कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, “सिडनी ही आमच्यासाठी संधी आहे की आम्ही एक संघ म्हणून जे करू शकतो ते करून दाखवू. आम्ही तो सामना चांगला खेळण्याचा प्रयत्न करू.” आता टीम इंडियासाठी सिडनी कसोटी जिंकणे खूप महत्त्वाचे झाले आहे. टीम इंडियाला डब्ल्यूटीसी फायनलच्या शर्यतीत कायम राहायचे असेल, तर पुढचा सामना जिंकावा लागेल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)