IND vs SA Head To Head: भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका आज होणार पहिला सामना; कोणता संघ आहे मजबूत, जाणून घ्या आकडेवारी

दक्षिण आफ्रिकेचा संघ संपूर्ण तयारीनिशी भारतात आला असला आणि सर्व मोठे खेळाडूही संघात खेळत असले तरी भारतीय संघाला मालिका जिंकणे सोपे जाणार नाही.

IND vs SA (Photo Credit - Twitter)

भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील तीन टी-20 (T20) सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. आज पहिला सामना खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाला (AUS) पराभूत केल्यानंतर टीम इंडिया (Team India) आता आपल्या नव्या मिशनला सुरुवात करण्याच्या तयारीत आहे. टीम इंडियाचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाकडून हरला असला तरी त्यानंतर भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत सलग दोन सामने जिंकून मालिका जिंकली. आता दक्षिण आफ्रिकेची पाळी आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ संपूर्ण तयारीनिशी भारतात आला असला आणि सर्व मोठे खेळाडूही संघात खेळत असले तरी भारतीय संघाला मालिका जिंकणे सोपे जाणार नाही. पहिला सामना आज तिरुवनंतपुरममध्ये होणार आहे.

दोन्ही संघांचे हेड टू हेड आकडे घ्या जाणून

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत झालेल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर, या दोघांमध्ये 20 टी-20 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 11 सामने टीम इंडियाने जिंकले आहेत आणि 8 सामने दक्षिण आफ्रिकेच्या संघाने जिंकले आहेत. एक सामना निकालाशिवाय संपला. तसं पाहिलं तर भारताचं पारडं जड वाटतं, पण तरीही हे आव्हान सोपं जाणार नाही. टीम इंडियाला मालिका जिंकण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे. खेळाडू आणि संघ कशी कामगिरी करतात हे पाहणे रंजक ठरेल.

नुकतीच खेळलेली मालिका राहिली अनिर्णित 

टीम इंडियासाठी दक्षिण आफ्रिकेचे आव्हानही सोपे जाणार नाही कारण आतापर्यंत टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेकडून त्याच्या भूमीवर एकही टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका जिंकता आलेली नाही. काही महिन्यांपूर्वीच भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिका संघ यांच्यात पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळली गेली होती, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दोन सामन्यात भारताचा पराभव केला होता, त्यानंतर भारताने दोन सामने जिंकले आणि मालिका बरोबरीत आली. मात्र तिसरा सामना पावसामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे मालिका अनिर्णीत संपली आणि निकाल लागला नाही. (हे देखील वाचा: IND vs SA 1st T20I: भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात पावसाचे संकट? जाणून घ्या कसे असेल हवामान)

ऋषभ पंत होता कर्णधार

त्या मालिकेत भारताचे मोठे खेळाडू खेळत नसले तरी कर्णधारपदाची जबाबदारी केएल राहुलकडे सोपवण्यात आली होती, पण अचानक तो दुखापतग्रस्त झाला, त्यामुळे तो संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आणि ऋषभ पंतला नवा कर्णधार बनवण्यात आले. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे खेळाडूही या मालिकेत खेळत नव्हते. पण आता जी मालिका होणार आहे, त्यात सर्वच मोठे खेळाडू खेळत आहेत आणि कमान पुन्हा एकदा रोहित शर्माच्या हाती आली आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement