IND vs BAN Semi Final: उपांत्य फेरीत भारत-बांगलादेश आमने सामने, हेड टू हेड आकडेवारीत कोणाचे आहे वर्चस्व? एका क्लिकवर घ्या जाणून

IND vs BAN: आता या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. या अहवालात भारत आणि बांगलादेश यांच्यात कोणाचा वरचष्मा आहे आणि भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला तर कोणत्या संघाचा सामना करू शकतो हे समजून घेऊ.

INDW vs BANW (Photo Credit - X)

Women's Asia Cup 2024: महिला आशिया चषक 2024 मध्ये (Women's Asia Cup 2024) भारतासह 4 संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. ग्रुप-अ मधून भारत आणि पाकिस्तान आणि ब गटातून श्रीलंका आणि बांगलादेश यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्याचबरोबर नेपाळ, यूएई, थायलंड आणि मलेशिया या संघांचा प्रवास ग्रुप स्टेजवरच थांबला आहे. आता या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. या अहवालात भारत आणि बांगलादेश यांच्यात कोणाचा वरचष्मा आहे आणि भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला तर कोणत्या संघाचा सामना करू शकतो हे समजून घेऊ. (हे देखील वाचा: IND vs SL T20I Head to Head: श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा कसा आहे रेकॉर्ड? येथे पाहा हेड टू हेड आकडेवारी)

भारताचा आतापर्यंतचा प्रवास

भारतीय संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिला आहे. संघाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 7 गडी राखून, दुसऱ्या सामन्यात यूएईचा 78 धावांनी तर तिसऱ्या सामन्यात नेपाळचा 82 धावांनी पराभव केला. संघाची स्टार फलंदाज शेफाली वर्मा पूर्ण फॉर्ममध्ये आहे. शेफालीने 3 सामन्यात 158 धावा केल्या आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी ती दुसरी फलंदाज आहे. शेफालीने नेपाळविरुद्ध 48 चेंडूत 81 धावांची शानदार खेळी केली. संघाची स्टार गोलंदाज दीप्ती शर्माने 3 सामन्यात 8 विकेट घेतल्या आहेत. ती या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज आहे. टीम इंडियाने 3 सामन्यांत 6 गुण जमा करून ग्रुप स्टेजमध्ये अव्वल स्थानावर राहून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

बांगलादेशची कामगिरी

बांगलादेश संघाने स्पर्धेत आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत. यामध्ये संघाने 2 सामने जिंकले असून 1 सामना गमावला आहे. पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा संघ 7 गडी राखून पराभूत झाला होता. यानंतर संघाने थायलंडचा 7 गडी राखून आणि मलेशियाचा 114 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. बांगलादेशने गट टप्प्यातील 3 सामन्यांतून 4 गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवून उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित केले आहे.

आकडेवारीत कोणाचे आहे वर्चस्व?

भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकूण 13 टी-20 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारताने 11 सामने जिंकले असून बांगलादेशने 2 सामने जिंकले आहेत. आशिया चषक स्पर्धेत दोन्ही संघ आतापर्यंत 4 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये भारताने दोनदा तर बांगलादेशने दोनदा विजय मिळवला आहे.

टीम इंडिया इतिहास रचणार 

महिला आशिया कपच्या आतापर्यंत एकूण 8 आवृत्त्या खेळल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाने 7 वेळा विजेतेपद पटकावले आहे, तर बांगलादेशने 2018 आशिया कपमध्ये एकमेव विजेतेपद पटकावले आहे.

अंतिम फेरीत आमचा सामना कोणाशी होणार?

जर टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली तर संघाचा विजेतेपदाचा सामना श्रीलंका किंवा पाकिस्तानशी होईल. श्रीलंकेचा संघ यापूर्वी 5 वेळा फायनलमध्ये पोहोचला आहे आणि प्रत्येक वेळी त्यांना टीम इंडियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचा संघ दोनदा आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे आणि दोन्ही वेळा टीम इंडियाकडून पराभूत झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement