IPL 2022 मधून बाहेर पडल्यावर Virat Kohli चे 12th मॅन आर्मीसाठी विशेष ट्विट, पाहा काय म्हणाला
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर शुक्रवारी आयपीएल 2022 मधून बाहेर पडल्यानंतर स्टार फलंदाज विराट कोहलीने चाहते आणि संघ व्यवस्थापनाचे आभार मानण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. “कधी कधी तुम्ही जिंकता, तर कधी नाही, पण 12 वी मॅन आर्मी, तुम्ही अप्रतिम आहात, आमच्या मोहिमेदरम्यान आम्हाला नेहमीच पाठिंबा दिला. तुम्ही क्रिकेटला विशेष बनवता. शिकणे कधीही थांबत नाही,” कोहलीने लिहिले.
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 मधून बाद होण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) राजस्थान रॉयल्स विरुद्ध क्वालिफायर 2 गमावल्यानंतर आरसीबीचा (RCB) स्टार विराट कोहलीने (Virat Kohli) चाहते आणि संघ व्यवस्थापनासाठी एक विशेष पोस्ट शेअर केली. कोहलीने सोशल मीडियावर आरसीबीच्या (RCB) व्यवस्थापनाचे आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत आणि त्याच्या आयपीएल (IPL) 2022 च्या मोहिमेतील फोटो देखील पोस्ट केले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)