World Cup 1983: 'माझे आणि भारतीय क्रिकेटचे आयुष्य बदलले', मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर भावूक; पहिला विश्वचषक जिंकणाऱ्या संघाबद्दल व्यक्त केला आदर
आजच्याच दिवशी चाळीस वर्षांपूर्वी, कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर अंतिम सामन्यात बलाढ्य वेस्ट इंडिजचा पराभव करून क्रिकेट विश्वचषक (World Cup 1983) जिंकला. आणि त्यानंतर भारतीय क्रिकेट जगाचे रुप बदलले.
लॉर्ड्सवर विश्वचषक ट्रॉफी पकडतानाचा कपिल देव (Kapil Dev) यांचा फोटो प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या आठवणींमध्ये रुजलेला आहे. हा विजयाचा क्षण होता ज्याने भारतीयांच्या पिढीला क्रिकेटचा खेळ गांभीर्याने घेण्याची प्रेरणा दिली. आजच्याच दिवशी चाळीस वर्षांपूर्वी, कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर अंतिम सामन्यात बलाढ्य वेस्ट इंडिजचा पराभव करून क्रिकेट विश्वचषक (World Cup 1983) जिंकला. आणि त्यानंतर भारतीय क्रिकेट जगाचे रुप बदलले. यानिमित्ताने भारताचा माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) भावूक झाला आणि पहिला विश्वचषक जिंकणाऱ्या संघाबद्दल ट्विट करत आदर व्यक्त केला. म्हणाला, 'भारताला प्रथमच विश्वचषक जिंकून 40 वर्षे पूर्ण झाली! 25 जून 1983 हा एक निश्चित क्षण होता ज्याने भारतीय क्रिकेट तसेच माझे आयुष्य कायमचे बदलले. त्या चॅम्पियन संघातील सर्व सदस्यांना आदरांजली'. (हे देखील वाचा: World Cup 83: भारताच्या ऐतिहासिक विजयाला 40 वर्ष पूर्ण! आजच्या दिवशीच कपील देवच्या शिलेदारांनी जिंकला होता विश्वचषक)