Ambernath Suicide Case: अंबरनाथमध्ये प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या, कुटुंबाच्या विरोधामुळे टोकाचे पाऊल?

कल्याणमधील (Kalyan News) एका तरुण जोडपे अंबरनाथ येथील कुशिवली गावात झाडाला मृतावस्थेत लटकलेले आढळले. त्यांच्या नात्याला कुटुंबाचा विरोध असल्याने ही घटना घडली असावी असा पोलिसांना संशय आहे. तपास सुरू आहे.

Death प्रतिकात्मक फोटो Photo Credit- X

ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ (Ambernath Suicide Case) तालुक्यातील कुशिवली (Kushivli Couple Death) गावात गुरुवारी सकाळी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका झाडाला दोघांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत युवक आणि युवतीची ओळख विवेक पाटील (वय 25) आणि मनीषा पाटील (वय 22) अशी झाली आहे. दोघेही कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरातील रहिवासी होते आणि एका खासगी कंपनीत लिपिक म्हणून काम करत होते. त्यांच्यात प्रेमसंबंध होते आणि या संबंधांना कुटुंबीयांचा विरोध असल्याच्या नैराश्येतून त्यांनी हे कृत्य केल्याचा पोलिसांना संशय आहे. युगुलाने आत्महत्या केलेला परिसर उल्हासनगर (Ulhasnagar Police) येथील हिल लाईन पोलिसांच्या अधिकारक्षेत्रात येतो. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाती मृत्यू अहवाल (ADR) नोंदवण्यात आला आहे आणि संशयित आत्महत्येमागील परिस्थिती शोधण्यासाठी सविस्तर तपास सुरू करण्यात आला आहे.

नेहमीप्रमाणे कामावरून गेले, मात्र घरी परतले नाहीत

अंबरनाथ येथे आत्महत्या केलेले युगुल बुधवारी (28 मे 2025) संध्याकाळी दोघे नेहमीप्रमाणे कामावरून बाहेर पडले, मात्र रात्रीपर्यंत घरी पोहोचले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी स्थानिक रहिवाशांना कुशिवली गावातील शेताच्या बाजूला दोघांचे मृतदेह झाडाला लटकलेले आढळले. (हेही वाचा, Ambernath Woman Murder Case: अंबरनाथमध्ये आर्थिक वाद आणि लग्नाच्या तगाद्यामुळे संतापलेल्या तरुणाने केली 35 वर्षीय विवाहित महिलेची हत्या; आरोपीला अटक)

स्थानिकांच्या माहितीवरुन पोलिस कारवाई

गावकरी जगन्नाथ पवार यांनी सर्वात प्रथम हे दृश्य पाहिले. त्यांनी सांगितले, “शेतातून चालत जात होतो तेव्हा झाडाला दोघेही पाठमोरे गळफास घेतलेले दिसले. अतिशय भीषण दृश्य होते.” त्यांनी पोलिसांना याबाबत तत्काळ माहिती दिली. हिल लाईन पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह पुढील वैद्यकीय तपासासाठी उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले.

कुटुंबाच्या विरोधामुळे आत्महत्येचा संशय

सिनिअर पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी घटनेची माहिती देताना सांगितले की, या प्रकरणात अपघाती मृत्यूची नोंद (ADR) करण्यात आली असून सखोल तपास सुरू आहे. घटनास्थळी कोणताही सुसाईड नोट आढळून आलेला नाही. मात्र, प्राथमिक तपासानुसार हे दोघे प्रेमसंबंधात होते आणि लग्न करू इच्छित होते. कुटुंबीयांनी त्यांना एक वर्ष थांबण्याचा सल्ला दिला होता, जो त्यांनी नकारात्मकपणे घेतल्याची शक्यता आहे.

उल्हासनगर विभागाचे उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितले, 'प्राथमिक चौकशीत असे दिसते की कुटुंबीयांच्या विरोधामुळेच दोघांनी टोकाचे पाऊल उचलले असावे. घटनास्थळी त्यांची मोटारसायकलही आढळली आहे. सध्या आम्ही त्यांच्या कुटुंबीयांचे आणि सहकाऱ्यांचे जबाब नोंदवत आहोत. मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि इतर डिजिटल पुरावेही तपासले जात आहेत.'

दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रेमसंबंध आणि कुटुंबीयांचा विरोध यामुळे तरुणाईवर येणारा मानसिक तणाव, समाजात पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून लवकरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement