Coronavirus: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सव्वादोन लाखांच्याही वर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले हे अवाहन

राज्यातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाची लाट पुन्हा एकदा वाढते आहे. राज्यात पुन्हा एकदा 46 हजार कोरोना रुग्णांची नव्याने भर पडली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग (Health Department) सतर्क झाला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी माहिती देताना सांगितले की राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 2,25,000 इतकी आहे.

Health Minister Rajesh Tope | (Photo Credits: ANI)

राज्यातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाची लाट पुन्हा एकदा वाढते आहे. राज्यात पुन्हा एकदा 46 हजार कोरोना रुग्णांची नव्याने भर पडली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग (Health Department) सतर्क झाला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी माहिती देताना सांगितले की राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 2,25,000 इतकी आहे. असे असले तरी नागरिकांनी घाबरुन जाण्याची काळची नाही. आरोग्य विभाग आणि राज्य सरकार खंबीर आहे. फक्त नागरिकांनी जर घरच्या घरी किटद्वारे चाचणी केली तर त्याची माहिती आरोग्य विभागाला द्यायला हवी असे अवाहन राजेश टोपे यांनी केले. राज्यातील पॉझीटीव्ह आलेल्या एकूण रुग्णांपैकी 86% रुग्ण होम क्वारंटाईन असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले.

अनेक लोक सेल्फ किटद्वारे चाचणी करतात. ती चाचणी पॉझिटीव्ह आली असता त्यातील बरेच लोक आरोग्य विभागाला कल्पना देत नाहीत. या लोकांनी आरोग्य केंद्रावर जाऊन आपल्याबाबत माहिती द्यायला हवी. आम्ही ओरोग्य केंद्र आणि संबंधित विभागांनाही कल्पना देऊन ठेवली आहे की, जे लोक सेल्फ किटद्वारे चाचणी करतात आणि त्यांना सौम्य लक्षणे असतील तर अशा नागरिकांना होम क्वारंटाईनच राहू देत. होम क्वारंटाईन असलेल्यांना आरोग्य विभागातून फक्त दोन कॉल करुन तुमच्या आरोग्यासंदर्भात माहिती जाणून घेतली जाईल. लक्ष ठेवले जाईल. (हेही वाचा, Coronavirus in Pune: पुण्यातील कोविड-19 लाट जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शिगेला पोहचू शकते; जाणून घ्या सध्याची परिस्थिती)

राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

  • लसीचा पहिला डोस घेतलेल्या लोकांचं प्रमाण 90%वर पोहोचले
  • दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांचं प्रमाण 62%
  • 15 टे 19 वयोगटातील मुलांचं 35% लसीकरण
  • 700 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागली तर लॉकडाऊन लावावा लागेल
  • सध्या नॉन कोविडसाठी अडीचशे तर कोविडसाठी दिडशे मेट्रिक टन ऑक्सिजन लागत आहे

अनेक नागरिकांनी अद्यापही लसीकरणास प्राधान्य दिले नाही. काहींनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले नाहीत. काहींनी एकच घेतला आहे मात्र दुसऱ्या डोसला प्राधान्य दिले नाही. काहींना बुस्टर डोसची गरजही भासते आहे. नागरिकांनी अधिकाधिक प्रमाणात लसीकरणास प्राधान्य द्यायला हवे असेही टोप म्हणाले. जिल्हाधिकारी, आयुक्तांनी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना लसीकरणासाठी पुढे आणले पाहिजे अशी भावना व्यक्त करतानाच लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनाच कार्यालयात प्रवेश देण्याबाबत आता विचार करावा लागेल असेही टोपे म्हणाले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Abu Azmi Retracts Statement On Aurangzeb: अबु आझमी यांच्याकडून औरंगजेब बद्दल केलेलं वक्तव्य मागे; 'चूकीचा अर्थ लावल्याने गोंधळ' झाल्याचं स्पष्टीकरण (Watch Video)

Recruitment Process For Teaching Positions: अकृषी विद्यापीठांमधील अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेस मान्यता; नवीन प्रक्रियेनुसार होणार निवड, मंत्री Chandrakant Patil यांची माहिती

Maharashtra-Karnataka Bus Services Row: पोलीस बंदोबस्तात सुरु होऊ शकते महाराष्ट्र व कर्नाटकमधील बस सेवा; गाड्यांमध्ये सुरक्षा मार्शल तैनात करण्याचा परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांचा विचार

Fraud-Forgery Case: महाराष्ट्राचे कृषी मंत्री Manikrao Kokate यांना दिलासा; 30 वर्षे जुन्या फसवणूक प्रकरणातील 2 वर्षांच्या शिक्षेला नाशिक सत्र न्यायालयाने दिली स्थगिती

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement