Cancer Deaths in India: भारतामध्ये एका वर्षात कर्करोगामुळे तब्बल 9.3 लाख मृत्यू, समोर आली 12 लाख नवीन प्रकरणे- Lancet Study
अहवालात म्हटले आहे की भारत, बांगलादेश आणि नेपाळ या दक्षिण आशियाई देशांमध्ये खैनी, गुटखा, पान मसाला (एसएमटी) सारख्या धूरविरहित तंबाखूचा प्रचार हा सामाजिक आरोग्यासाठी चिंतेचा विषय आहे.
Cancer Deaths in India: कॅन्सर (Cancer) हा असा आजार आहे, त्यावर उपचार करूनही या आजाराने मरणाऱ्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. कॅन्सरचे नाव जरी ऐकले तरी लोकांचा थरकाप उडतो, अशात या रोगाने मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. भारतात, 2019 मध्ये कर्करोगामुळे 9.3 लाख लोकांनी आपला जीव गमावला आणि सुमारे 12 लाख नवीन कर्करोगाच्या रुग्णांची नोंद झाली. मेडिकल जर्नल द लॅन्सेटने आपल्या एका लेखात ही माहिती दिली आहे. 2019 मध्ये कॅन्सरग्रस्तांच्या संख्येत भारत चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर असल्याचेही सांगण्यात आले आहे.
संशोधकांना असे आढळून आले की भारत, चीन आणि जपान हे कर्करोगाच्या नवीन रुग्णांच्या आणि मृत्यूच्या संख्येच्या बाबतीत आशियातील तीन मोठे देश आहेत. 2019 मध्ये आशियामध्ये 94 लाख नवीन कॅन्सरची प्रकरणे नोंदवली गेली आणि 56 लाख मृत्यू झाले. चीनमध्ये सर्वाधिक 48 लाख नवीन रुग्ण आणि 27 लाख मृत्यू झाले आहेत. संशोधकांचे म्हणणे आहे की कर्करोग हा सार्वजनिक आरोग्यासाठी धोका बनला आहे आणि हे खूप चिंताजनक आहे.
संशोधकांच्या आंतरराष्ट्रीय संघात राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी) कुरुक्षेत्र, एम्स जोधपूर आणि एम्स भटिंडा येथील संशोधकांचाही समावेश होता. आशियामध्ये, कर्करोगाची सर्वाधिक संख्या श्वसनमार्ग, ब्रॉन्कस आणि फुफ्फुस (टीबीएल) ची होती. हा पुरुषांमध्ये सर्वोच्च आणि स्त्रियांमधील तिसरा सर्वात मोठा आजार होता. शास्त्रज्ञांना आढळून आली की महिलांमध्ये, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा अनेक आशियाई देशांमध्ये दुसरा सर्वात सामान्य किंवा शीर्ष पाचपैकी एक कर्करोग आहे.
2006 मध्ये सादर करण्यात आलेली मानवी पॅपिलोमा व्हायरस (HPV) लस कर्करोग रोखण्यासाठी आणि एचपीव्ही संबंधित मृत्यू कमी करण्यासाठी प्रभावी सिद्ध झाली आहे, असे संशोधकांनी सांगितले. धूम्रपान, दारूचे सेवन आणि प्रदूषण हे देखील कर्करोगाच्या 34 कारणांपैकी एक असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. शास्त्रज्ञांनी अहवालात लिहिले आहे की, आशियातील वाढते वायू प्रदूषण ही देखील चिंतेची बाब आहे. (हेही वाचा: Covid's JN.1 Variant in Maharashtra: 'कोरोनाचा ‘जेएन-1’ हा नवीन उपप्रकार घातक नाही', मात्र कोविड अनुरूप नियमांचे पालन करून काळजी घेण्याचे राज्य सरकारचे आवाहन)
अहवालात म्हटले आहे की भारत, बांगलादेश आणि नेपाळ या दक्षिण आशियाई देशांमध्ये खैनी, गुटखा, पान मसाला (एसएमटी) सारख्या धूरविरहित तंबाखूचा प्रचार हा सामाजिक आरोग्यासाठी चिंतेचा विषय आहे. ज्यामध्ये एकट्या भारताचा हिस्सा 32.9 टक्के आहे. अहवालानुसार, 2019 मध्ये जगात तोंडाच्या कर्करोगाची 28.1 टक्के नवीन प्रकरणे नोंदवली गेली. 50 टक्क्यांहून अधिक तोंडाच्या कर्करोगासाठी धूररहित तंबाखू जबाबदार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)