Tamil Nadu Shocker: वर्गमित्रांच्या चेष्टेला कंटाळून 80 विद्यार्थ्यांनी सोडली शाळा; तामिळनाडूमधील धक्कादायक घटना

शालेय शिक्षण मंत्री अनबिल महेश पोय्यामोळी यांनी याआधी सांगितले होते की, राज्यात शाळा सोडण्याचा धोका असलेल्या शालेय विद्यार्थ्यांची ओळख पटवण्याची मोहीम सुरू आहे. गेल्या वर्षी राज्यातील सुमारे 1.8 लाख शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांची ओळख पटली.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: ANI)

तमिळनाडूच्या (Tamil Nadu) तंजावर जिल्ह्यातील किमान 80 आदिवासी विद्यार्थ्यांनी त्यांच्या वर्गमित्रांकडून अपमानित आणि चेष्टा होत असलेल्या प्रकारानंतर आरोपानंतर शाळेत जाणे बंद केले आहे. विद्यार्थी नारिकुरवा समाजाचे आहेत. जिल्हा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या विद्यार्थ्यांच्या विचित्र बोलण्यामुळे आणि पद्धतीमुळे इतर विद्यार्थी त्यांची चेष्टा करतात, ज्यामुळे विद्यार्थी शाळा सोडू लागले आहेत.

तंजावर जिल्हा अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, अंगणवाडी सेविका, पोलीस, चाइल्डलाइन, एकात्मिक शालेय शिक्षण विभाग आणि ब्लॉक संसाधन शिक्षक यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील सर्वेक्षणानंतर विद्यार्थ्यांची ओळख पटली.

गेल्या शैक्षणिक वर्षात 1,700 विद्यार्थ्यांनी शाळा सोडली असल्याचे या टीमला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या गळतीवरील अभ्यासात आढळून आले. नारीकुर्वा समाजातील 80 विद्यार्थ्यांनी शाळेत जाणे बंद केल्याचे टीमला आढळल्यानंतर, शिक्षकांनी सांगितले की, विद्यार्थी नारिक्कुरवा टाऊनशिपमधील मेला उल्लुर गावातील असून ते प्राथमिक विभागात शिकत होते. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पाण्याचे नाले आणि वन्य प्राणी जंगल पार करावे लागते. परंतु त्यांचे सहकारी विद्यार्थी त्यांची चेष्टा करतात, त्यामुळे त्यांनी शाळेत जाणे बंद केले आहे.

तंजावर जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी आयएएनएसला सांगितले की, जिल्हा अधिकारी त्यांच्या निवासस्थानी एक शाळा सुरू करण्याचा विचार करत आहेत. उपलब्ध माहितीनुसार, त्यांच्या निवासस्थानाजवळ एक शाळा होती, परंतु ती कोविड-19 महामारीच्या काळात बंद करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना नीट शिक्षण मिळावे यासाठी आता ही शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी अधिकारी प्रयत्नशील आहेत. (हेही वाचा: 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार? दीपक केसरकर यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका)

दरम्यान, शालेय शिक्षण मंत्री अनबिल महेश पोय्यामोळी यांनी याआधी सांगितले होते की, राज्यात शाळा सोडण्याचा धोका असलेल्या शालेय विद्यार्थ्यांची ओळख पटवण्याची मोहीम सुरू आहे. गेल्या वर्षी राज्यातील सुमारे 1.8 लाख शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांची ओळख पटली मात्र त्यानंतर त्यांची शाळांमध्ये पुन्हा नोंदणी करण्यात आली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now