Nupur Sharma Controversy: नुपूर शर्माच्या वादानंतर हॅकर्सचा भारतावर हल्ला, 2000 हून अधिक वेबसाइट्स हॅक

ड्रॅगन फोर्स मलेशिया आणि हॅक्टिव्हिस्ट इंडोनेशिया या दोन हॅकर गटांनी भारताविरुद्ध सायबर युद्ध सुरू केले आहे. दोन्ही गटांनी जगभरातील मुस्लिम हॅकर्सना भारतावर सायबर हल्ला (Cyber Attack) करण्याचे आवाहनही केले आहे.

Nupur Sharma (Photo Credit - Twitter)

नुपूर शर्माच्या घटनेनंतर (Nupur Sharma Controversy) अहमदाबाद क्राइम ब्रँचने (Ahmedabad Crime Branch) म्हटले आहे की मलेशिया आणि इंडोनेशियातील मुस्लिम हॅकर्सनी भारताविरुद्ध सायबर युद्ध सुरू केले आहे. ड्रॅगन फोर्स मलेशिया आणि हॅक्टिव्हिस्ट इंडोनेशिया या दोन हॅकर गटांनी भारताविरुद्ध सायबर युद्ध सुरू केले आहे. दोन्ही गटांनी जगभरातील मुस्लिम हॅकर्सना भारतावर सायबर हल्ला (Cyber Attack) करण्याचे आवाहनही केले आहे. अहमदाबाद सायबर क्राइम ब्रँचने सांगितले की हॅकर्स ग्रुपने 2 हजारांहून अधिक वेबसाइट हॅक (Websites Hacked) केल्या आहेत. हॅकर्सनी नुपूर शर्माचे घर आणि वैयक्तिक माहिती ऑनलाइन टाकली. याशिवाय आसाममधील एका प्रादेशिक वाहिनीवर थेट प्रक्षेपणाच्या मध्यभागी पाकिस्तानचा ध्वज दाखवण्यात आला. हॅकर्सनी ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅक केली. एवढेच नाही तर आंध्र प्रदेश पोलिसांची वैयक्तिक माहितीही देण्यात आली. लोकांचे आधार कार्ड आणि पॅनकार्ड ऑनलाईन लीक झाले.

सायबर क्राईमने मलेशिया आणि इंडोनेशिया सरकारला पत्र लिहिले

अहमदाबाद सायबर क्राइमने यासंदर्भात मलेशिया आणि इंडोनेशिया सरकारला पत्र लिहिले आहे. पत्रात अहमदाबाद सायबर क्राईमने दोन्ही गटांसाठी इंटरपोल लुकआउट नोटिसचा संदर्भ दिला आहे. विशेष म्हणजे नुपूर शर्माने पैगंबर मोहम्मद यांच्यावर दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी निदर्शने झाली. उदयपूरमध्ये एकाची गळा चिरून हत्या करण्यात आली. याशिवाय अरब देशांमध्येही मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला. अरब देशांमध्येही अनेक ठिकाणी भारतीय वस्तूंवर बहिष्कार टाकल्याच्या बातम्या आल्या. (हे देखील वाचा: Aadhar Card : सावधान! तुमच्या आधार कार्ड होवू शकतो गैरवापर; जाणून घ्या महत्वाच्या टीप्स)

अनेक शहरांमध्ये FIR दाखल झाले

या वादग्रस्त वक्तव्यानंतर नुपूर शर्माविरोधात देशातील अनेक शहरांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेत म्हटले आहे की, नुपूरवर दाखल झालेले गुन्हे वेगवेगळ्या शहरांमध्ये आहेत, ते सर्व एकत्र दिल्लीला वर्ग करण्यात यावे. पण सुप्रीम कोर्टाने ते फेटाळून लावत नुपूरवर जोरदार टिप्पणी केली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement