Sabarimala Temple: शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशानंतर भाजपकडून सडकून टीका

अखेर आज सकाळी केरळमधील शबरीमाला मंदिरात दोन महिलांनी प्रवेश करुन देव दर्शन घेतले. महिलांच्या या कृत्यावर भाजपने सडकून टीका केली आहे.

Sabarimala Temple (Photo Credits: ANI)

गेल्या अनेक दिवसांपासून केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वाद रंगला होता. अखेर आज सकाळी शबरीमला मंदिरात दोन महिलांनी प्रवेश करुन देव दर्शन घेतले. महिलांच्या या कृत्यावर भाजपने सडकून टीका केली आहे.

ही घटना खरी असेल तर अत्यंत विनाशकारी असल्याचे ट्विट भाजपचे माहिती आणि तंत्रज्ञानाचे राष्ट्रीय प्रमुख अमित मालवीय (Amit Malviya) यांनी केले आहे.

तर केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी (Smirti Irani) यांनी या घटनेचा निषेध नोंदवला. प्रार्थना करण्याचा अधिकार असला तरी पवित्र स्थळाचा अपमान करायचा अधिकार आपल्याला नाही, असे त्यांनी म्हटले आहे. "मी हिंदू असून माझा पती पारशी आहे आणि पारशांच्या अग्यारीत प्रवेश करण्यास मला बंदी आहे," असे म्हणत त्यांनी शबरीमला मंदिरातील महिला प्रवेश बंदीला यापूर्वी सर्मथन दर्शवले होते. केरळ: सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही शबरीमलामध्ये महिलांना प्रवेश नाही

बिंदु (Bindu)  आणि कनकदुर्गा (Kanakdurga)  या दोन महिलांनी मंदिरात प्रवेश करुन शेकडो वर्षांची परंपरा मोडली. या महिलांच्या प्रवेशानंतर मंदिर शुद्धीकरणासाठी बंद ठेवण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेशासाठी मान्यता दिली असली तरी न्यायालयाच्या या निर्णयाला प्रचंड विरोध झाला. त्यामुळे अद्याप महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता.

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)

लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)

Dress Code in Mahalaxmi And Jyotiba Temples: कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू; ठिकाणांची पवित्रता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने घेतला निर्णय

India-Pakistan Tension: शिर्डीचे साई बाबा मंदिर व मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात नारळ, हार-फुले, प्रसाद अशा कोणत्याही वस्तू नेण्यास बंदी; भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement