दलितांची वरात आढवणाऱ्या 8 जणांवर दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती मंदसौरच्या एसपींनी दिली आहे. गुराडीया येथून माहिती मिळाली होती की काही लोकांनी दलितांची वरता आडवली होती. या वेळी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वरात काढून दिली. या घटनेत 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्र सरकार शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतंय. त्यात सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांच्यासारख्या सेलिब्रिटींची दिशाभूल होत आहे, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधिर रंजन चौधरी यांनी केला आहे.
जोशीमठ येथे झालेल्या दुर्घटनेप्रकरणी बचावकार्यासाठी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी ITBP, NDRF,SDRF, पोलिसांसह अन्य कंपन्यांची बैठक बोलावली आहे.
उत्तराखंड मध्ये जोशी मठ परिसरामध्ये काल हिमकडा कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या भागात धौलीगंगा नदीवरीला ऋषी गंग़ा पॉवर प्रोजेक्टवर नुकसान झालेले आहे. यामध्ये 130 पेक्षा अधिक लोकं अडकली आहेत. त्यांना बचावण्यासाठी आयटीबीपी जवान युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. सध्या बोगद्यामध्ये अडकलेल्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावरून आता या दुर्घटनेत बळी गेलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
दरम्यान जगभरात भारताकडून लस पोहवण्याचं काम सुरू आहे. यामध्ये आज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून Barbados & Dominica मध्ये लसी रवाना झाल्या आहेत. भारतामध्येही 55 लाखापेक्षा अधिक लोकांना लस देण्यात आल्या आहेत.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
मिरारोड परिसरामध्ये आज मध्यरात्री सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आहे. ही आग शांती गार्डन परिसरात लागली होती. दरम्यान सिलेंडरच्या गाड्या देखील भरलेल्या असलेल्याने मोठ्या प्रमाणात आगीचा स्फोट झाला आहे मात्र आता आग नियंत्रणामध्ये आहे.