Babri Masjid Demolition Case: बाबरी मशीद विध्वंस प्रकरणातील 32 आरोपींच्या निर्दोष मुक्ततेविरोधात AIMPLB सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार
विशेष सीबीआय न्यायालयाने 2020 मध्ये बाबरी मशीद विध्वंस प्रकरणातील (Babri Masjid Demolition Case) 32 आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आरोपींमध्ये माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.
Babri Masjid Demolition Case: बाबरी मशीद विध्वंस प्रकरणातील आरोपींच्या निर्दोष सुटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने (All India Muslim Personal Law Board,AIMPLB) म्हटले आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने 2020 मध्ये बाबरी मशीद विध्वंस प्रकरणातील (Babri Masjid Demolition Case) 32 आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आरोपींमध्ये माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.
दरम्यान, 6 डिसेंबर 1992 रोजी हजारो हिंदू कारसेवकांनी अयोध्येतील बाबरी मशीद पाडली. त्यांचा असा विश्वास होता की हे भगवान रामाचे जन्मस्थान असलेल्या उध्वस्त हिंदू मंदिराच्या अवशेषांवर बांधले गेले होते.मशीद पाडली तेव्हा त्या जागेच्या मालकीबाबत खटला सुरू होता. सर्वोच्च न्यायालयाने 2019 मध्ये हिंदूंना जमीन दिली. त्या जमिनीवर आता राम मंदिर उभारले जात आहे. (हेही वाचा -Babri Masjid Demolition: बाबरी मशीद विध्वंसाला आज ३० वर्ष पुर्ण, जाणून घ्या तीस वर्षांचा घटनाक्रम)
या वर्षाच्या सुरुवातीला अयोध्येतील दोन रहिवासी, हाजी मेहबूब आणि सय्यद अखलाक यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयासमोर पुनर्विचार याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने 9 नोव्हेंबर रोजी पुनरीक्षण याचिका फेटाळून लावली. एआयएमपीएलबीचे कार्यकारी सदस्य आणि प्रवक्ते सय्यद कासील रसूल इलियास म्हणाले की, बोर्डाने आता निर्दोष सुटण्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
रसूल पुढे म्हणाले, “आम्ही नक्कीच सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत कारण अयोध्येच्या निकालात सर्वोच्च न्यायालयानेच बाबरी मशीद पाडणे हे गुन्हेगारी कृत्य असल्याचे मान्य केले आहे. ऐतिहासिक अयोध्येचा निकाल देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांनी बाबरी मशीद विध्वंस हे कायद्याच्या नियमाचे गंभीर उल्लंघन असल्याचे खंडपीठाने निकाल देताना म्हटले होते आणि आरोपी अजूनही फरार आहेत." (हेही वाचा - राम मंदिर- बाबरी मशीद वादाचा काय होता इतिहास? जाणून घ्या सविस्तर)
रसूल यांनी सांगितले की, अपीलकर्ते हाजी मेहबूब आणि सय्यद अखलाक हे सीबीआयचे साक्षीदार होते आणि त्यांच्या घरांवर 6 डिसेंबर 1992 रोजी हल्ला करण्यात आला. आरोपींनी जमवलेल्या जमावाने त्यांना जाळले. मेहबूब आणि अखलाक बाबरी मशिदीजवळ राहत असल्याचेही त्यांनी सांगितले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)