Air Pollution: जगात वायू प्रदूषणाचा धोका वाढला; वर्षाला होत आहे तब्बल 70 लाख लोकांचा मृत्यू- WHO

जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी प्रदूषणासंदर्भात नवीन हवेच्या गुणवत्तेची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार जवळजवळ संपूर्ण भारत प्रदूषित श्रेणीत समाविष्ट होत आहे. डब्ल्यूएचओ जगाला स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत आहे

Delhi Air Pollution control Measures | (Pic Courtesy: PTI)

जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी प्रदूषणासंदर्भात नवीन हवेच्या गुणवत्तेची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार जवळजवळ संपूर्ण भारत प्रदूषित श्रेणीत समाविष्ट होत आहे. डब्ल्यूएचओ जगाला स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत आहे, या अंतर्गत नवीन स्केल सेट केले गेले आहेत. 2005 नंतर प्रथमच हवेच्या गुणवत्तेची मार्गदर्शक तत्त्वे कडक करण्यात आली आहेत. डब्ल्यूएचओने असाही दावा केला आहे की, वायू प्रदूषणामुळे जगात दरवर्षी 70 लाख लोकांचा मृत्यू होत आहे. तसेच वायू प्रदूषण लोकांच्या जीवनातील अनेक वर्षेही कमी करत आहे.

न्यूयॉर्क, यूएसए येथे आयोजित संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेतील हा या वर्षातील सर्वात मोठा आणि प्रमुख विषय आहे. वायू प्रदूषणाच्या बाबतीत भारतात 2009 मध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार काम चालू आहे, ज्यामुळे पुढील वर्षी ते बदलण्याचे लक्ष्य सरकारने निश्चित केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, वायू प्रदूषणाचे परिणाम जगाच्या मोठ्या भागात दिसून येत आहेत, ज्यामुळे लोकांना प्रदूषित हवेच्या संपर्कात राहण्यास भाग पाडले जात आहे.

डब्ल्यूएचओच्या मते, जगातील सुमारे 90% लोकसंख्या आणि दक्षिण आशियातील संपूर्ण लोकसंख्या प्रदूषित वातावरणात राहत आहे. यासह, जगातील मृत्यूचे एक महत्वाचे कारण म्हणजे PM 2.5 Particle हे आहे, ज्यामुळे 80% मृत्यू होत आहेत. या कणामुळे श्वासोच्छवासाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पुण्यातील श्वसन रोग तज्ञ डॉ संदीप साळवी, जे ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज अभ्यासाचा भाग आहेत, म्हणतात की भारताची 95 टक्के लोकसंख्या आधीपासूनच डब्ल्यूएचओच्या 2005 च्या नियमांपेक्षा जास्त प्रदूषणाची पातळी असलेल्या भागात राहत आहे. (हेही वाचा: UK Government कडून Travel Advisory मध्ये बदल करत Covishield चा Approved Vaccine मध्ये समावेश; भारतीयांना Quarantine चे नियम राहणार)

WHO च्या मते, आशियातील देशांना वायू प्रदूषणाचा सर्वाधिक धोका आहे. यामध्येही दिल्लीत प्रदूषण 17 पटीने वाढले आहे. त्याचवेळी, पाकिस्तानातील लाहोरमध्ये प्रदूषण 16 पट, ढाकामध्ये 15 पट आणि चीनमधील झेंग्झौमध्ये 10 पट वाढले आहे. दिल्ली हे देशातील आणि आशियातील सर्वात प्रदूषित शहर आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement