IND vs PAK, ICC World Cup 2019: 'हे युद्ध नाही'! भारत-पाक सामन्याआधी वसीम आक्रमच चाहत्यांना आव्हान

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना विश्वचषक स्पर्धेत किंवा त्या बाबतीत कोणत्याही आयसीसी स्पर्धेत महत्वाचा मानला जातो.

(Image Credit: PTI)

भारत (India) विरुद्ध पाकिस्तान (Pakistan) सामना विश्वचषक स्पर्धेत किंवा त्या बाबतीत कोणत्याही आयसीसी (ICC) स्पर्धेत महत्वाचा मानला जातो. दोन्ही देशांच्या लाखो चाहते आपली देशभक्ती, राष्ट्रवाद आणि उत्साह प्रदर्शित करण्यासाठी या सामन्याचा वापर करतात. यंदाच्या विश्वकपमध्ये फायनलपेक्षा सर्वाधिक हाय व्होल्टेज मॅच म्हणजे भारत-पाकिस्तानची होणारी टक्कर. दोन संघात होणारी लढत ही काही चाहते आपल्या इज्जतीचा प्रश्न समजून घेतात त्यामुळे या सामन्याआधी माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू वसीम अक्रम (Wasim Akram) यांनी दोन्ही संघाच्या चाहत्यांना शांतता राखण्याची विनंती केली आहे. (IND vs PAK, World Cup 2019 Stats: टॉस जिंका, पहिले Bowling करा; मॅन्चेस्टर सामन्यासाठी चा मंत्र)

"भारत-पाकिस्तान आणि अब्जपेक्षा जास्त चाहते विश्वचषकमध्ये, हे क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी गोष्ट आहे, म्हणून चाहत्यांना आव्हान करतो की शांतता राखा आणि या दोन संघातील सामन्याचा आनंद घ्या," वसीम अक्रम चाहत्यांना विनंती करत म्हणाले.

"एक संघ विजयी होईल, एक संघ हरणार, म्हणून खुश रहा आणि याला युद्ध म्हणून ते घेऊ नका. जे चाहते भारत-पाक सामना युद्ध म्हणून प्रक्षेपित करतात ते खरे क्रिकेट प्रेमी नाही," अक्रम पुढे म्हणाले.

आजवर भारत-पाकिस्तान विश्वकप सहा वेळा आपने-सामने आले. मात्र एकदाही पाकिस्तानी संघ भारताला शकलेला नाही. रविवारी होणाऱ्या सामन्यात भारत आपला रेकॉर्ड कार्यक्रम ठेवणार कि पाकिस्तान आपल्या पहिल्या विजयाची नोंद करतात हे बघण्यासारखे असणार.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement