टीम इंडियाच्या या स्टार फिरकीपटूच्या मदतीसाठी Rohit Sharma आला धावून, योजने अंतर्गत करवले होते IPL डेब्यू; 8 वर्षानंतर गोलंदाजाने उघडलं गुपित

टीम इंडियाचा 30 वर्षीय अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहलने इंडियन प्रीमियर लीगमध्ये पहिले भारतीय संघाचा साथीदार आणि मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्माने पहिली संधी दिल्याचे श्रेय दिले आहे. 2013 मध्ये जेव्हा शर्मा पहिल्यांदा मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाला, तेव्हा तो त्याच्या खोलीत आला आणि तो वानखेडे येथे पदार्पण करणार असल्याचे सांगितले.

कुलदीप यादव, रोहित शर्मा आणि युजवेंद्र चहल (Photo Credit: Twitter/BCCI)

टीम इंडियाचा (Team India) 30 वर्षीय अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आज भारताच्या मर्यादित ओव्हर संघाचा मुख्य सदस्य बनला आहे. टीम इंडियासाठी सध्या तो एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये ट्रम्प कार्ड आहे. चहलने आयपीएलमध्ये (IPL) कठोर परिश्रम करत टीम इंडियापर्यंत प्रवास केला आहे. चहलने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) पहिले भारतीय संघाचा साथीदार आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पहिली संधी दिल्याचे श्रेय दिले आहे. त्यांनी इंडिया टीव्हीशी संभाषणात सांगितले की, 2013 मध्ये जेव्हा रिकी पॉन्टिंगनंतर शर्मा पहिल्यांदा मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाला, तेव्हा तो त्याच्या खोलीत आला आणि तो वानखेडे (Wankhede Stadium) येथे पदार्पण करणार असल्याचे सांगितले. चहलने इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध आयपीएलमध्ये डेब्यू केले. (Yuzvendra Chahal On Kul-Cha: चहल ने सांगितले- टीम इंडियाची घातक फिरकी जोडी ‘कुलचा’ का तुटली? रवींद्र जडेजाशी कसा आहे कनेक्शन)

वानखेडे विकेट वेगवान गोलंदाजांना सहसा मदत करत असल्याने शर्माच्या निर्णयाने युजवेंद्र चहल आश्चर्यचकित झाले होते. त्याशिवाय हरभजन सिंह आणि प्रग्यान ओझाच्या रूपात संघात आधीच दोन जागतिक दर्जाचे फिरकीपटू होते. चहलने सांगितले रोहित आणि त्याची 2011 पासून ओळख असून दोघांमध्ये चांगले संबंध आहेत. पदार्पणाच्या सामन्याआधी तो शानदार गोलंदाजी करीत असल्याचे चहलने सांगितले, परंतु पदार्पण सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नाही. चहलने पुहे सांगितले की, हरभजन आणि ओझाला आधीपासूनच संघात हजर ठेवणे, मला संधी देण्याचा कट होता. चहल म्हणाला, “मी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगला खेळलो होती आणि सराव सामन्यात मला विकेट मिळाली. पण मुंबईची विकेट अशी होती की तेथे तीन फिरकीपटू खेळू शकत नव्हते. आणि त्या वेळी भज्जू पा आणि ओझा भैया कसोटी दिग्गज होते. म्हणून मी खूप उत्साही झालो आणि रोहित भैय्या मला आश्वासन दिले की मी तुम्हाला संधी देईन. तिथूनच आमचे बंधन सुरू झाले.”

दरम्यान, चहलला त्याच्या पहिल्या आयपीएल सामन्यात एकही विकेट मिळाली नाही आणि त्यानंतर तो पुन्हा मुंबईकडून खेळला नाही. पण या हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. चहलच्या आयपीएल कारकीर्दीबद्दल बोलायचे तर आयपीएलच्या आजवरच्या करिअरमध्ये त्याने 105 डावात 125 विकेट्स घेतल्या आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement