IND vs WI 1st Test: शतक झळकावल्यानंतर यशस्वी जैस्वाल बनला 'या' भारतीय फलंदाजाच शत्रू! पुनरागमनासाठी सर्व दरवाजे केले बंद
पहिल्या कसोटी सामन्यात 350 चेंडूत 143 धावा केल्यानंतर यशस्वी जैस्वाल क्रीजवर आहे. यशस्वी जैस्वालने आतापर्यंत 14 चौकार मारले आहेत. कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी, यशस्वी जैस्वालला त्याच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकवण्याच्या मार्गावर आहे.
Yashasvi Jaiswal Century: भारताचा नवीन सलामीवार यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) आपल्या पहिल्या आतंराष्ट्रीय सामन्यात वेस्टइंडिजविरुद्ध (IND vs WI) शतक झळकावून अनेक विक्रमांना गवसनी घातली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात 350 चेंडूत 143 धावा केल्यानंतर यशस्वी जैस्वाल क्रीजवर आहे. यशस्वी जैस्वालने आतापर्यंत 14 चौकार मारले आहेत. कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी, यशस्वी जैस्वालला त्याच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकवण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान, भारताचा स्फोटक सलामीवीर यशस्वी जैस्वालने टीम इंडियाच्या धडाकेबाज क्रिकेटपटूची कसोटी कारकीर्द जवळपास संपुष्टात आणली आहे. आता भारतीय कसोटी संघातील यशस्वी जैस्वालमुळे त्या खेळाडूच्या पुनरागमनाचे सर्व दरवाजे जवळपास बंद झाले आहेत.
यशस्वी जैस्वालने झळकावले शतक
भारतीय कसोटी संघात सलामीवीर केएल राहुलच्या पुनरागमनासाठी यशस्वी जैस्वालने जवळपास सर्व दरवाजे बंद केले आहेत. शुभमन गिल भारतीय कसोटी संघात क्रमांक-3 वर खेळत राहील. अशा परिस्थितीत आता केएल राहुलच्या भारतीय कसोटी संघात पुनरागमनाचे सर्व दरवाजे जवळपास बंद झाले आहेत. आता केएल राहुलला पुन्हा एकदा भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सलामी देणे शक्य होणार नाही. झंझावाती फलंदाज यशस्वी जैस्वालने वेस्ट इंडिजविरुद्धचा ट्रेलर दाखवला, त्यानंतर तो टीम इंडियाचा कायमस्वरूपी सलामीवीर बनेल असे मानले जात आहे. (हे देखील वाचा: IND vs WI 1st Test: विराट कोहलीने वीरेंद्र सेहवागला टाकले मागे, गावस्कर-तेंडुलकरांच्या स्पेशल क्लबमध्ये सामील)
पुनरागमनाचे सर्व दरवाजे जवळपास बंद
भारतीय संघ व्यवस्थापन भारतीय कसोटी संघासाठी धोकादायक सलामीवीर शोधत होते, ज्याचा शोध आता पूर्ण झाला आहे. यशस्वी जैस्वाल हा एकमेव फलंदाज आहे जो भारतीय कसोटी संघात रोहित शर्मासोबत सलामी करत राहील. आता केएल राहुलसाठी कसोटी क्रिकेटचे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत आणि त्याच्या शेवटच्या कसोटी सामन्यांमध्ये केलेल्या कामगिरीनंतर त्याला पुन्हा कसोटी संघात स्थान मिळणे कठीण आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये रोहित शर्माने सलामीवीर केएल राहुलला संधी दिली, पण तो फ्लॉप ठरला. यानंतर केएल राहुलला उपकर्णधारपदावरून हटवण्यात आले.
यशस्वी जैस्वाल संघासाठी ठरु शकतो एक्स फॅक्टर
भारतीय कसोटी संघाला ज्या स्फोटक सलामीवीराची टीम इंडियाला गरज आहे तीच यशस्वी जैस्वाल आहे. यशस्वी जैस्वाल टीम इंडियाचे सर्वात मोठे शस्त्र ठरू शकते. यशस्वी जैस्वालची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो डावखुरा फलंदाज आहे. डाव्या हाताचे फलंदाज हे कोणत्याही संघासाठी एक्स फॅक्टर ठरतात. यशस्वी जैस्वालकडूनही टीम इंडियाला मजबूत संतुलन मिळेल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)